शहरं
Join us  
Trending Stories
1
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
3
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
4
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
5
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
6
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
7
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
8
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
9
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."
10
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
11
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
12
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
14
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
15
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
16
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
17
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
18
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
19
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
20
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान

अपहार प्रकरणी संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा

By admin | Published: June 22, 2014 11:14 PM

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात अपहारप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात एक लाख, १४ हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, संस्थाचालकाविरूध्द अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे़पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर येथील अमर परमेश्वर-कदम यांनी तुळजापूर न्यायालयात अपहार प्रकरणी तक्रार दिली होती़ नळदुर्ग येथील सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरीअल उर्दू शाळेचे अध्यक्ष सय्यद तनवीरअली खतीब, सचिव जावेद वलीउल्ला काझी, मुख्यध्यापिका महेबुबी अ-रजाक शेख यांनी संगणमत करून शालेय पोषण आहारात १६ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर २०१३ व २१ आॅक्टोबर २०१३ या कालावधीत इंधन, भाजीपाला खर्चापोटी जवळपास एक लाख, १४ हजार रूपयांचा बनावट खर्च दाखवून अपहार करीत शासनाची फसवणूक केली़ तुळजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधीक्षक एस़आरग़ुरव, विस्तार अधिकारी गंगाधर सर्जे, केंद्रप्रमुख एम़एस़भोरे यांची नियुक्ती केली होती़ या पथकाने १३ सप्टेंबर रोजी शाळेस भेट देवून पंचनामा करून अहवाल दाखल केला होता़ पंचनाम्यादरम्यान पाच वर्गखोल्यात १ लाख, ६ हजार ३९४ रूपयांचा ७८ क्विंटल ५० किलो तांदळाचा अनाधिकृत साठा आढळून आला होता़ मिळालेल्या साठ्यातल १५ क्विंटल तांदळाची नासाडी झाली होती़ तर ३७ पॉकेट गोडेतेल कालबाह्य झाले होते़ असे असतानाही मुख्याध्यापिकेने तांदूळ संपल्याचा अहवाल वरिष्ठांना देत तांदळाची मागणी केली होती़ तांदूळ शिल्लक असतानाही ते शिजविण्यासाठीची मजुरी, भाजीपाला व इंधनाच्या खर्चाची मागणीही प्रशासनाकडे करून खर्ची टाकली होती़ याप्रकरणी सर्वस्तरातून कारवाईची मागणी होत असताना प्रशासनाने मात्र सोईस्करपणे भिजतघोंगडे ठेवले होते़ याबाबत कदम यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने ९ महिन्यानंतर संस्थाध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले़ न्यायालयाच्या आदेशावरून वरील तिघाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एम़वाय़डांगे हे करीत आहेत़ (वार्ताहर)हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाकडून अद्याप कारवाई न करता भिजत घोंगडे कायम ठेवले आहे़ संस्थेने मुख्याध्यापिकेस यापूर्वीच निलंबित केले आहे़ तांदळाचा साठा शिल्लक असताना पुन्हा पुरवठा का केला, चौकशीत तांदूळ शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले असतानाही मजुरी, भाजीपाला व इंधनापोटी खर्ची केलेली रक्कम वसूल का केली नाही, अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी दिल्यानंतरही तांदूळ शिल्लक कसा राहिला यासह इतर अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.