शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:06 IST

फडणवीसांची राज्यातील पूर्ण प्लॅनिंग फेल करणार; मनोज जरांगे यांचा इशारा

वडीगोद्री( जालना):मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर गंभीर आरोप केले. उपमुख्यमंत्री  फडणवीस यांची राज्यातील विधानसभेची प्लॅनिंग पूर्ण अपयशी करणार असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज दिला. “मला मोठ्या डाकूला खेटायचं आहे” असे जाहीर करत २० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाची अंतिम निर्णय बैठक आयोजित केली असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. आज सकाळी महायुती सरकारमधील सर्व पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले की, २० तारेखेच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करायचे की सरकारविरोधात लढायचे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. जरांगे यांनी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चेसाठी उद्या अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली आहे. त्यांनी आवाहन केले की, ज्यांना शक्य आहे त्यांनी या बैठकीत उपस्थित राहावे आणि मराठा समाजाच्या भविष्यातील दिशा ठरवण्यात आपला सहभाग द्यावा. 

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली मात्र, एकमात्र एकनाथ शिंदेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, असे सांगितले. शिंदे यांच्या धाडसी भूमिकेचे समर्थन करत जरांगे म्हणाले की, “तुम्हाला कोण काम करून देत नाही हे आम्हाला माहित नाही. मी सहा कोटी मराठ्यांना सांगितलं होतं की शिंदे साहेब आरक्षण देतील, पण अजूनही ते मिळालेलं नाही.”

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटले की, “फडणवीस यांनी ओबीसींमध्ये १५ जातींचा समावेश करून मराठ्यांचे प्रमाणपत्र रोखले. केसेस केल्या, ज्यामुळे मराठा युवकांना नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवणे कठीण झाले. फडणवीस यांनी दिलेले आश्वासन फसवे ठरले.”  जरांगे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि नुकसानीच्या भरपाईच्या मुद्द्यांवरही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल त्यांनी सरकारला धारेवर धरले. “तुम्हाला आमचे मुडदे बघायची सवय लागली आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारविरोधातील असंतोष व्यक्त केला.

निर्णय झाल्यास मागे हटणार नाही२० ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत मराठा समाजाचा पुढील राजकीय निर्णय ठरवला जाईल, आणि जर एकदा निर्णय झाला तर तो मागे घेतला जाणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस