शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

आज आघाडीवर शिक्कामोर्तब

By admin | Published: January 30, 2017 12:04 AM

जालना जागा वाटपावर एकमत होऊन सोमवारी आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

 जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत पाच सर्कलवरुन सुरू असलेले मतभेद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जागा वाटपावर एकमत होऊन सोमवारी आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहेत. मतविभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात युती तुटल्याचे जाहीर केले. त्यानंतर जिल्ह्यातही भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत बैठकांचे सत्र सुरु झाले. नेहमीप्रमाणे जागा वाटपावर मतभिन्नता दिसून आली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ४० जागांवर लढणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. राजेश टोपे यांनी सांगितले. तर काँग्रेसचा जनाधार वाढला असून, ग्रामीण भागात काँग्रेससाठी पूरक वातावरण असून, पूर्वीपेक्षा जागा वाढवून द्याव्यात, अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी घेतली. गत आठवडाभरापासून केवळ चर्चाच सुरु असल्याने यावर निर्णय होऊ शकलेला नाही. युती तुटल्याचे कळताच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्यावर भर दिला आहे. मतविभाजन होणे दोन्ही पक्षांना परवडणारे नाही, त्यामुळे काँग्रेसने दोन पाऊले पुढे यावे आणि आम्हीही दोन पाऊले मागे येऊ, असा आग्रह आ. राजेश टोपे यांनी धरला आहे. तर आघाडीबाबत काँग्रेस सकारात्मक असून, कार्यकर्त्यांनाही न्याय देण्याच्या दृष्टिने पूर्वीपेक्षा जागा वाढवून द्याव्यात, अशी आग्रही मागणी माजी आ. जेथलिया यांनी केली आहे. घनसांवगी, बदनापूर, भोकरदन आणि जालना या तालुक्यांतील काही जागांबाबत मतभेद आहेत. यावरच लवकरच तोडगा काढला जाईल. तसेच आघाडीवर उद्या शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.