शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश नोंदणीसाठी उद्याचा शेवटचा दिवस, नवीन नियमांचा फटका

By राम शिनगारे | Updated: May 9, 2024 17:34 IST

यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरवली आहे. ३० एप्रिलपर्यंतच्या मुदतीत अवघ्या ५९ हजार ३४६ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठीच्या नोंदणीला १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा-२००९ नुसार (आरटीई) खासगी आस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. या जागांवर गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या शुल्कांची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते. मात्र, यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. त्यामुळे खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेशाचे स्वप्न भंगणार असल्याचेच स्पष्ट होत आहे. 

राज्य शासनाने खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांना प्राधान्य देण्याचे धाेरण स्वीकारले. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या नोंदणीत सुरुवातीच्या १५ दिवसांमध्ये राज्यातील आरटीई पात्र ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ जागांवर फक्त ५९ हजार ३४६ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. हे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन नोंदणीला १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. कालावधी वाढीव दिला असला तरी नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दुरापास्त असल्याची चिंता शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली .

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAurangabadऔरंगाबाद