शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

रस्त्यावरील टपऱ्यांवर जीभेचे लाड, पण पाणी कोणते पिताय? आरोग्याचे काय?

By साहेबराव हिवराळे | Published: July 11, 2024 7:16 PM

विविध रहदारीच्या चौकात खवय्येगिरीची दुकाने व टपऱ्या खूप परिचित आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरात रस्त्यांवरील टपऱ्यांवर आरोग्याच्या बाबतीत किती काळजी घेतली जाते? अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे नियंत्रण टाळण्यावर जास्त भर दिला जात आहे. तुम्ही पोट भरण्याच्या कालावधीत काही गोष्टींकडे कानाडोळा करतात अन् पोटदुखी अन् ॲसिडीटीचे प्रकार समोर येतात त्यामुळे नागरिकांना डोकेदुखी, मळमळ उलट्यांचा त्रासही सहन करावा लागतो. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थावर उड्या पडलेल्या दिसतात ते अन् उघड्यावर असते, वापरलेले तेल पुन्हा वापरात घेतले जाते. अशा अनेक घटना घडतात त्याचा परिणाम मात्र आरोग्यावर होतो.

या ठिकाणी विक्रीसिडको कॅनॉट, सिडको, हडको, रेल्वे स्टेशन , शहागंज, सातारा- देवळाई , शिवाजीनगर, छावणी, चिकलठाणा, वाळूज,शेंद्रा आदीसह विविध रहदारीच्या चौकात खवय्येगिरीची दुकाने व टपऱ्या खूप परिचित आहेत. परंतु अनेकांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना हुलकावणी देत काही नोंद नाही आणि भरमसाट व्यवसायावर भर दिलेला दिसतो आहे.

पाणी किती स्वच्छ?शहरात पाणी पुरवठ्याचे तीन तेरा झाले असून, व्यावसायिक खाऊच्या दुकानावर नळाचे पाणी असेलच अशी व्यवस्था टाळली जाते. प्लास्टिकचा जार ठेवला जातो. तो जार शुद्ध की अशुद्ध पाण्याचा आरोग्य बिघडण्यासाठीचा आहे हे फक्त नशीबच ठरते.

नाष्टा किती आरोग्यदायीऔद्योगिक क्षेत्रात मिळणारा नाष्टा किती आरोग्यदायी आहे असे सांगता येत नाही, कामावर थकलेेला व्यक्ती नाष्टा मिळेल तो खातो आणि दिवसभर कष्ट करतो अचानक बाहेरचे खाण्यात आल्याने पोट बिघडले असे म्हणून दवाखाने गाठताना दिसतात.

पाणीपुरीत कोणते पाणी...पाणीपुरी अगदी आवडीने आपण लेकरा बाळासह खातो परंतु त्यात वापरणारे मसाले पाणी आरोग्यदायीच कशावरून त्यांचीही तपासणी होताना दिसत नाही.

ना परवाना, ना कुठली तपासणीगर्दीच्या ठिकाणी स्टॉल उभारून कमाई केली जाते परंतु आरोग्यदायी पदार्थ खाण्यास मिळत नाही.त्यांच्याकडे परवाना देखील कुठे दिसत नाही,

सहा महिन्यांत किती टपऱ्यांवर कारवाई?सहा महिन्यांत काही आस्थापनाला भेटी देऊन त्यांची खाद्यपदार्थाची तपासणी केलेली आहे. परंतु टपऱ्या मात्र मोकाट सोडलेल्या आहे. त्याकडे का लक्ष दिले जात नाही. असा प्रश्न उठतो तेव्हा पाणीपुरी, स्टॉल तपासणीची मोहीम हाती घेतलेली असून, लवकर कारवाई होणार आहे.- निखिल कुलकर्णी,निरीक्षक अन्न व औषध प्रशासन

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागAurangabadऔरंगाबादfoodअन्न