शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

'खमके प्रशासक अन् कडक शिस्तीचे भोक्ते'; कुलगुरूंचे अधिकार दाखवून देणारे प्रमोद येवले

By राम शिनगारे | Updated: January 1, 2024 14:55 IST

कुलगुरू प्रमोद येवले यांनी कार्यकाळात खमका प्रशासक काय करू शकतो आणि कुलगुरूंचे अधिकार काय असतात, हे सर्वांना दाखवून दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची डॉ. प्रमोद येवले यांनी १६ जुलै २०१९ रोजी सूत्रे स्वीकारली होती. रविवारी (३१ डिसेंबर) त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. महामानवाच्या नावाने असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविण्याची त्यांना संधी मिळाली.

डॉ. येवले यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा आर्थिक अनागोंदीने परमोच्च शिखर गाठलेले होते. काही विभागप्रमुख ४९९९ रुपयांची बिले सादर करून पैसे उचलत होते. तेव्हा डॉ. येवले यांनी काही दिवस अभ्यास करीत आर्थिक शिस्तीचा बडगा उगारला. १ रुपयांचे बिल द्यायचे असेल तरी कुलगुरूंची परवानगी आवश्यक केली. प्रत्येक बिल तपासून जाऊ लागले. सुरुवातीला पेंडन्सी वाढली. मात्र, ४९९९ सारखी बिले येणे थांबली. आता त्यांचा कार्यकाळ संपला, तेव्हा विद्यापीठाकडे ३५ कोटी रुपये शिलकीत आहेत.

विद्यापीठात चार वर्षांपूर्वी विविध प्राधिकरणांचे पदाधिकारी, संस्थाचालक, काही संघटना आवाज चढवून हवा तसा निर्णय घेण्यास भाग पडत होत्या. त्यास चाप बसवला. स्वत:च्या हातात घेऊन फाईल घेणारे फिरणे बंद करण्यासाठी फाईल ट्रॅकिंग सिस्टीम आणली. त्यामुळे प्रशासन पारदर्शकता अन् गतिमानता झाले. पहिले वर्ष संपण्यापूर्वीच कोरोनाच्या महाभयंकर संकटाला सामोरे जावे लागले. त्यात दोन वर्षे गेली. या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यापीठात स्टेटिंग लॅब सुरू केली. टपरीछाप महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला. महाविद्यालयांचे अकॅडमिक ऑडिट केले. अनेक राजकीय दबाव आले तरी त्यास बधले नाहीत. मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या प्रत्येकावर निर्बंध आणले. चुकलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी दिली. त्यानंतरही काही चुका केल्यास संबंधितांवर कारवाईस करण्यास मागेपुढे पाहिले नाही. विभागीय चौकशीत दोषी आढळलेल्यांना सेवेतून बडतर्फ केले. अधिकाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या करताना व्यक्तीच्या सोयीपेक्षा प्रशासनाची सोय पाहिली.

विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या निवडणुका पारदर्शकपणे घेतल्या. त्यात नियम डावलून कोणतेही कृत्य होऊ दिले नाही. आर्थिक, प्रशासकीय शिस्त आणतानाच महाविद्यालयांवर शैक्षणिक गुणवत्तेसाठी कार्यवाही केली. मात्र, विद्यापीठातील विभागांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. विभागप्रमुख, प्राध्यापकांशी संवाद साधून शैक्षणिक गुणवत्तेचा आणखी आलेख वाढविता आला असता. आर्थिक शिस्तीच्या बडग्यामुळे अनेक प्राध्यापक संशोधनाच्या फंदात पडले नाहीत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषद, अध्यासन केंद्रांचे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले नाहीत. विद्यापीठातील अभ्यास मंडळ, अधिसभा, विद्या परिषदेवरील काही नियुक्त्या, प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांच्या नेमणुकी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे कराव्या लागल्या. त्याचाही फटका विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्तेवर बसल्याचे दिसून आले. एकच व्यक्ती सर्व बाबतीत १०० टक्के समाधान करू शकत नाही, हेही तितकेच खरे.

या काही बाबी असतानाच अनेक वर्षांपासून प्रलंबित संतपीठाचा प्रश्न मार्गी लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. ऐतिहासिक विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण झाले. विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनातील शहिदांच्या स्मारकाचे काम सुरू केले. इतरही कामे पूर्णत्वाला गेली. कार्यकाळात त्यांनी खमका प्रशासक काय करू शकतो आणि कुलगुरूंचे अधिकार काय असतात, हे सर्वांना दाखवून दिले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद