शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

उपमहापौर निवडणुकीत राजकीय पक्षांचा कस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 19:24 IST

भाजप अपक्ष आघाडीचे कार्ड वापरणार

ठळक मुद्देशिवसेनेची अग्निपरीक्षा

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : उपमहापौर विजय औताडे यांचा राजीनामा आज मंजूर झाला. त्यानंतर लगेच महापालिका प्रशासनाने उपमहापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्याची कारवाई सुरू केली. आठ ते दहा दिवसांमध्ये उपमहापौरपदासाठी निवडणूक घ्यावी लागेल. या निवडणुकीत शिवसेनेला अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागणार आहे. अर्ध्या सत्तेतून बाहेर पडलेला भाजप अपक्ष आघाडीला पुढे करून नवीन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या आघाडीला एमआयएमने पाठिंबा दिल्यास भाजपचे पारडे ऐनवेळी जड होऊ शकते.

महापालिका निवडणुकीसाठी चारच महिने शिल्लक आहेत. एप्रिल २०२० मध्ये निवडणुका घेण्यात येतील. त्यापूर्वी ४५ दिवस अगोदर आचारसंहिता लागेल. अडीच महिन्यांसाठी महापालिकेत उपमहापौरपदाची निवडणूक घ्यावी लागत आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज विजय औताडे यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर प्रशासनाने लगेच विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्याची कारवाई सुरू केली. पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये निवडणूक घेण्याचा कार्यक्रम निश्चित होईल. महापालिकेच्या इतिहासात असा प्रसंग यापूर्वी कधीच आला नाही. राज्यातील राजकीय समीकरणे बदलताच महापालिकेतही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपने पूर्णपणे महापालिकेतील सत्ता सोडलेली नाही. वॉर्ड सभापती, स्थायी समिती सभापती ही महत्त्वाची पदे आजही भाजपच्या ताब्यात आहेत.

काँग्रेस देणार उमेदवारीराज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केले आहे. आता मनपाच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेला अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागेल. बहुमताचा आकडा ५६ राहणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी आणि अपक्षांना सोबत घेऊन बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे.

भाजपची राजकीय खेळीउपमहापौर निवडणुकीत भाजप उमेदवारी देईल, अशी शक्यता कमीच आहे. भाजपसोबत असलेल्या अपक्ष आघाडीकडून एक उमेदवार निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. भाजप, अपक्ष आघाडी एमआयएमचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करील. हा प्रयोग यशस्वी झाला, तर सेनेची डोकेदु:खी वाढणार, हे निश्चित.

भाजप आपला उमेदवार देईलनिवडणूक लागेल किंवा नाही याची शाश्वती नाही. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास भाजप आपला उमेदवार देईल. सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत उमेदवार निवडून आणून दाखवावे.-किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भाजप,

पक्षीय बलाबलशिवसेना-     २९भाजप-     २४एमआयएम-    २४काँग्रेस-     ११बीएसपी-     ०५राष्ट्रवादी काँग्रेस- ०४रिपाइं (डेमोक्रॅटिक)-     ०२अपक्ष-     १७एकूण     ११५

विभागीय आयुक्तांकडे नोंदणीनुसार४० राष्ट्रीय लोकशाही आघाडी (शिवसेना)२६ एमआयएम आघाडी२२ भारतीय जनता पार्टी१३ शहर विकास आघाडी (भाजपप्रणीत)११ काँग्रेस आघाडीगटात नोंदणी न केलेले सदस्य- सचिन खैरे, अप्पासाहेब हिवाळे, अफसर खान

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस