शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सिग्नल यंत्रणा भेदून थेट प्लॅटफॉर्मवर धडकलेल्या रेल्वे इंजिनने चुकविला काळजाचा ठोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:19 IST

हे इंजिन ८० कि.मी.च्या वेगाने सर्व सिग्नल यंत्रणा भेदून थेट रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबले

ठळक मुद्देब्रेक नादुरुस्त झाल्याने सिग्नल तोडलेचिकलठाणा ते रेल्वेस्टेशनदरम्यान मोठी दुर्घटना टळली

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : रेल्वे रुळावरून ८० कि.मी.च्या वेगाने धडधडत धावणारे रेल्वे इंजिन आवाज करीत प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येऊन थांबल्याची काळजाचा ठोका चुकविणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. 

चिकलठाणाहून निघाल्यानंतर रेल्वे इंजिन सर्व सिग्नल यंत्रणा तोडून थेट औरंगाबाद स्टेशनवर धाडकन येऊन थांबले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ब्रेक नादुरुस्तीतून ही घटना घडल्याचे समजते; परंतु घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे इंजिन नादुरुस्त होण्याच्या घटना नवीन नाहीत. इंजिन नादुरुस्तीच्या घटनांमुळे वारंवार प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. नांदेड विभागातील रेल्वे जुन्या इंजिनवरच धावत असल्याची ओरड होते. या घटनेने रेल्वे अधिकाऱ्यांचा थरकाप उडाला. मालगाडीसाठी औरंगाबादला ४ जानेवारी रोजी कोडी येथून एक इंजिन दाखल होत होते. हे इंजिन चिकलठाणा रेल्वेस्टेशनपर्यंत सुरळीतपणे पोहोचले. त्यानंतर औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पोहोचेपर्यंत काहीतरी वेगळे घडेल, याची रेल्वे अधिकाऱ्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.

चिकलठाणाहून येणारे रेल्वेचे इंजिन दुपारी ४ वाजेच्या सुमारास सर्व सिग्नल यंत्रणा भेदून थेट रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर खर्रर्र असा आवाज करीत येऊन थांबले. ८० कि.मी.च्या वेगाने धावणाऱ्या इंजिनच्या या घटनेने एकच धावपळ झाली. क्षणभर रेल्वे अधिकाऱ्यांनाही कळले नाही की, नेमके काय झाले. कोणी म्हणत होते चालकाने सिग्नल यंत्रणेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून इंजिन प्लॅटफॉर्मवर आणले. यासंदर्भात प्राथमिक चौकशी केली असता ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा प्रकार घडला. चालकाने वेळीच आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशी सुरू आहे या घटनेत रेल्वे इंजिनचे ब्रेक नादुरुस्त झाले होते, की अन्य काही कारण आहे, इंजिन चालक दोषी आहे का, याची दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर इंजिन औरंगाबादलाच ठेवण्यात आले, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या घटनेविषयी अधिक माहिती घेतली जाईल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAccidentअपघात