शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

टंचाईचे उपाय टोलवाटोलवीतच

By admin | Published: February 17, 2016 10:54 PM

हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यात टंचाईच्या प्रस्तावांची निव्वळ टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप आता ग्रामीण भागातून होत आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यात टंचाईच्या प्रस्तावांची निव्वळ टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप आता ग्रामीण भागातून होत आहे. जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालयातील या खेळात टंचाईची दाहकता मात्र ग्रामस्थांना सोसावी लागत आहे.सध्या जिल्ह्यात विहिरी व बोअरच्या अधिग्रहणाचे ७५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याशिवाय १0 गावांत आठ टँकर सुरू आहेत. यापैकी एक खाजगी टँकर आहे. नळयोजना विशेष दुरुस्तीचे जठारवाडी व हत्ता देववाडी यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाणीटंचाईत दुरुस्तीचे आठ प्रस्ताव पाठविले होते. त्यात त्रुटी निघाल्याने त्यांनी ते परत पाठविले. मात्र यात महिना निघून गेला आहे. याशिवाय यांत्रिकी विभागाने २८ गावांत ३१ बोअर घेण्याचे प्रस्ताव पाठविले होते. तेही अद्याप तसेच पडून आहेत. या दोन्ही विभागांत कधी ताळमेळ साधला जात नसल्याचे गतवर्षीही अनुभवायला मिळाले होते. मात्र जानेवारीनंतर गेल्यावर्षी पाणीटंचाईत निदान प्रस्ताव मंजूर झाले होते. ही मंजूर झालेली कामे पावसाळ्यातही पूर्ण करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले. त्यामुळे टंचाईत मंजूर होणाऱ्या कामांना काही महत्त्वच उरत नाही. ग्रामस्थही या झंझटी नको म्हणून थेट टँकरचीच मागणी करतात. या सर्व प्रकारात टंचाईच्या झळा मात्र सोसणे क्रमप्राप्त ठरते. प्रस्तावांची चौकशी, त्रुटी असणे याचा ससेमिराही आड येतो. (जिल्हा प्रतिनिधी)