शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

जिल्ह्यातील दोनशे गावे होणार टँकरमुक्त

By admin | Published: January 02, 2015 12:40 AM

औरंगाबाद : जलयुक्त शेतशिवार कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोनशे गावांची निवड करण्यात आली असून, आगामी वर्षात ही गावे टँकरमुक्त करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज सांगितले.

औरंगाबाद : जलयुक्त शेतशिवार कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोनशे गावांची निवड करण्यात आली असून, आगामी वर्षात ही गावे टँकरमुक्त करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज सांगितले. सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जलयुक्त शेतशिवार कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत गावात जलसंधारणाची विविध कामे केली जाणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात या प्रकल्पासाठी पहिल्या वर्षी दोनशे गावांची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या दोनशे गावांमध्ये जलसंधारणाची कामे करून ही गावे वर्षभरात टँकरमुक्त केली जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले. या गावांमधील प्रकल्पांमधील गाळ काढणे, प्रकल्पांची दुरुस्ती करणे, छोट्या पातळीवर नदी जोड प्रकल्प राबविणे आदी कामांचा या कार्यक्रमात समावेश आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून(डीपीडीसी) तून सहा टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय इतर विविध शीषर्काखालीही निधी उपलब्ध होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि इतर योजनांमधून कामे करता येणार आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.