शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे; अंबादास दानवेंची टीका

By संतोष हिरेमठ | Updated: June 30, 2024 14:51 IST

‘लाडकी बहिण योजना‘ जाहीर केली. परंतु अटी, शर्थीमुळे फार मोजक्या महिलांना योजनेची मदत मिळेल.शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या. परंतु १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्याचे देणे आहे.'

छत्रपती संभाजीनगर : जे दोन वर्षे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात होते, त्यांनी शिवसेना फोडण्याचे, गद्दारीचे काम केले. सध्याच्या सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीविषयी बोलताना अंबादास दानवे यांनी हे विधान केले.

माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘लाडकी बहिण योजना‘ जाहीर केली. परंतु अटी, शर्थीमुळे फार मोजक्या महिलांना योजनेची मदत मिळेल.शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या. परंतु १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्याचे देणे आहे. राज्यात २५ हजार कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प असताना विविध घोषणांचा अमलबजावणी कशी होईल, असा प्रश्न आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात विजेचा दर जास्त आहे. ग्रामीण भागात २ ते ४ तासांवर वीज मिळत नाही.

वीजेची कमतरता आहे. वीज मिळतच नाही, मोफत वीजेचा काय फायदा होईल, हे येणाऱ्या काळात दिसेल. शेतकऱ्यांना दिलेल्या मोफत वीजेची घोषणा फार्स ठरण्याची शक्यता आहे. सरकारकडे असलेली वीज आणि शेतकऱ्याला लागणारी वीज याचे प्रमाण काढले तर शेतकऱ्याला वीज मिळणे अवघड आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. पीक विमा एक रुपयात देण्याची घोषणा सरकारने केली.

शेतकऱ्यांचा वाटा सरकारने भरला. परंतु पीक विमा कंपन्यांच्या दादागिरी वाढली आहे. महाज्योती, सारथी, बार्टी या सगळ्या योजनांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. विद्यार्थ्यांना सवलती मिळालेल्या नाहीत. दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या विरोधातील असल्याचेही दानवे म्हणाले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद