शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:05 AM

महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनानंतर आज भाजपानं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केले. 

छत्रपती संभाजीनगर - शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते त्यांच्या हॉटेलबाहेर जमले होते. त्यावेळी घोषणाबाजी करताना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी हाणामारीही झाली. 

पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते, त्यामुळे आज आदित्य ठाकरे ज्या रामा हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे भाजपा कार्यकर्ते विरोध करण्यासाठी पोहचले होते. तिथे जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि मोठा राडा बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली तेव्हा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असा आरोप अंबादास दानवेंनी केला. तर भाजपा आंदोलकांनी आक्रमक होत आम्ही दिशा सालियन प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरे संघटनात्मक दौऱ्यावर आलेले आहेत. आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार, परंतु कुणाच्या घरासमोर, हॉटेलसमोर आंदोलन करायचे नसते. भाजपा व्यक्तिगत हेतूने आंदोलन करत होते. शिवसैनिकांना राग आला. शिवसैनिकांनी जे करायचे ते केले. पोलीस आणि भाजपा एकत्रित येऊनही आमच्या अंगावर आले तरी शिवसैनिक पुरून उरतील. आमचे आंदोलन देशातील महिलांच्या सुरक्षेविषयी होते. आमचे आंदोलन मोदींविरोधात नव्हते. आम्ही घोषणाबाजी केली नाही. काळी फिती लावून आंदोलन केले. संजय राठोड, राहुल शेवाळे यांचीही प्रकरणे आहेत ना, बदलापूर प्रकरणी पोलिसांनी दडपशाही केले. पोलिसांच्या काठीने आम्ही घाबरत नाही. पोलीस पक्षपातीपणे वागतायेत. आंदोलन करायचे होते तर क्रांती चौकात करायचे होते असं त्यांनी सांगितले. 

राड्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, माझ्याविरोधात जे आंदोलन केले ते मोदींविरोधात आम्ही आंदोलन केले त्यासाठी केले. आम्ही महिलांच्या अत्याचाराविरोधात आंदोलन केले. आम्ही शक्ती कायदा आणला, महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे? पोलिसांवर हल्ले होतायेत. बदलापूर प्रकरणी नागरिक रस्त्यावर येतात, त्यांना तुम्ही राजकीय बोलता, पण पीडित कुटुंबाची तक्रार घ्यायला १२ तास का लागले? आम्ही पक्षाविरोधात नाही तर विकृतीविरोधात आंदोलन केले. ज्यांना भाजपा घाबरते, त्याला बदनाम करण्याचं राजकारण भाजपा करतं असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmbadas Danweyअंबादास दानवेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४