शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

दोन वर्षापूर्वी जाहीर केलेल्या गुंतवणुकीबाबत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 19:50 IST

मंदी व जीएसटीमुळे काही उद्योगांनी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करूनही पुढील पाऊल उचलले नसल्याची चर्चा उद्योगवर्तुळात आहे. 

ठळक मुद्दे डीएमआयसी, एमआयडीसीमध्ये मंदी, जीएसटीनंतरची परिस्थिती

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पावणेदोन वर्षापूर्वी दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसीअंतर्गत आॅरिक सिटी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे विविध उद्योगांशी सामंजस्य करार केले. मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत केलेल्या त्या करारांचे पुढे काय झाले, याबाबत अनिश्चितता आहे. मंदी व जीएसटीमुळे काही उद्योगांनी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करूनही पुढील पाऊल उचलले नसल्याची चर्चा उद्योगवर्तुळात आहे. 

कोट्यवधी रुपये गुंतवणुकीचे अनेक करार विविध उद्योगांसोबत झाल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये औद्योगिक उलाढालीसह रोजगार निर्मितीला चालना मिळण्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, पुढे या करारांचे काय झाले, गुंंतवणुकीतून उभे राहिलेले उद्योग सुरू झाले की नाही, याची कोणतीही माहिती डीएमआयसी, एमआयडीसीकडे आजघडीला उपलब्ध नाही. हमदर्द, पॅरासन, बीकेटी, सीटीआरसोबतच जालन्यातील स्टील उद्योगांतील गुंंतवणुकीचा समावेश होता. ३१०० जणांना रोजगार देण्याची क्षमता त्या प्रकल्पांत होती. २ लाख ४६ हजार चौ.मी. जागा या उद्योगांना दिल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. लातूरमध्ये १३९ हेक्टर जागा अतिरिक्त एमआयडीसीमध्ये रेल्वे कोच निर्मितीच्या उद्योगासाठी दिली; परंतु त्यातून अजून उत्पादन सुरू झाले नाही. 

अँकर प्रकल्प ह्योसंगही मंदगतीनेकोरियन कंपनी ‘ह्योसंग’ हिने शेंद्र्यामध्ये ३ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे़  आॅरिकसाठी ‘ह्योसंग’ हा अँकर प्रोजेक्ट ठरेल, असे बोलले जात असले तरी या प्रकल्पाची गती अजून मंदच आहे. टेक्सटाईल क्षेत्रातील कोरियन कंपनी ह्योसंगचा १०० एकर जागेत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून एक हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. तसेच ई-व्हेईकल क्षेत्रातील परदेशी कंपनी लोम्बोर्गिनी येथे मोठी गुंतवणूक करणार असल्याचा दावा मध्यंतरी उद्योग खात्याने केला होता.

एमआयडीसीचे मत असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, किती करार झाले, याची माहिती सध्या तरी नाही. माहिती घेऊन नेमके काय झाले हे सांगता येईल.

डीएमआयसीचे मत असेडीएमआयसीचे सहसंचालक गजानन पाटील यांनी सांगितले, डीएमआयसीअंतर्गत आॅरिक सिटीमध्ये ५२ कंपन्यांसोबत एमओयू केले होते. त्यांना जागा दिली आहे. त्या कंपन्या तेथे आल्या आहेत. काही कंपन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. एमआयडीसीने कुणासोबत करार केले, याबाबत मला सांगता येणार नाही.

टॅग्स :MIDCएमआयडीसीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा