शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:49 IST

सर्व उद्योग गुजरातला पाठविणाऱ्या भाजपचे राजकारण महाराष्ट्र विरोधी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला

छत्रपती संभाजीनगर : संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला देशातील जनतेने २४० वर रोखले. महाराष्ट्रात त्यांनी संविधान चिरडले आहे, यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही संविधानासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई असेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रविवारी शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उशीर झाल्याने थेट आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, राज्यात आता कोणीही खुश नाही. शेतकरी नाराज आहे, तरुणांना रोजगार नाही. मात्र, काहींना ७२ व्या मजल्यावर फ्लॅट मिळाला, तर कोणाला टोल नाके मिळाले आहे. गद्दारांची दोन वर्षांत जशी प्रगती झाली तशी राज्याची प्रगती झाली नसल्याचे आदित्य यांनी नमूद केले.

भाजपचे राजकारण राज्यविरोधीभाजपचे राजकारण महाराष्ट्र विरोधी असल्याचा आरोप करीत आदित्य म्हणाले की, हे सर्व उद्योग त्यांनी गुजरातला पाठविले. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणाऱ्या मर्सिडिज बेंज कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने धाड मारली. कशासाठी मारली धाड, काय कारवाई केले याचे उत्तर द्यावे लागेल असेही ठाकरे म्हणाले.

चार जेसीबी आणि क्रेन लावून स्वागतआदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी एका क्रेनवर मोठा हार लावण्यात आला होता. तसेच चार जेसीबीमधून फुलांची उधळण त्यांच्यावर करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबादShiv Smarakशिवस्मारकvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपा