शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

पाणी जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पाणीपातळीत मोठी घट

By साहेबराव हिवराळे | Published: April 03, 2024 6:23 PM

जलसाक्षर व्हा : शहरात ज्यांंनीही बोअरवेल पुनर्भरण केलेले आहे, त्यांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळते.

छत्रपती संभाजीनगर : रखरखत्या उन्हात नद्या-नाले व तसेच पाणथळ कोरड्या होत आहेत. शहरात सिमेंटचे जंगल वाढल्याने बोअरवेलनेही तळ गाठला आहे. केवळ पाच मिनिटेही बोअरवेल चालणे अवघड आहे. आता जलसाक्षर होण्याची व बोअरवेल पुनर्भरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मालमत्ताधारकांकडून मनपा प्रशासनाने घरांच्या बांधकाम परवान्यातच बोअरवेल पुनर्भरणाची एक अट टाकावी, जेणेकरून जलसाक्षर होणे गरजेचे आहे. नळाला तोट्या लावणे, पावसाळ्यात घराच्या छतावरील पाणी वाहून न जाऊ देता ते बोअरवेलमध्ये जिरविणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि ऐन हिवाळ्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. शहरात ज्यांंनीही बोअरवेल पुनर्भरण केलेले आहे, त्यांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळते. परंतु घर आणि दार आणि अंगणातही सिमेंटचा गिलावाच शहरवासीयांनी घालण्याचा सपाटा लावला असल्याने जमिनीत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण होत नसेल तर पाणीपातळी वाढणार कशी, असा सवाल आहे.

मार्च २०२४ची पाणीपातळी घट मीटरमध्ये पुढीलप्रमाणे :छत्रपती संभाजीनगर- ०.४८, गंगापूर- १.१६, कन्नड - ०.५२, पैठण- १.००, सिल्लोड- १.५४, सोयगाव- १.०७, वैजापूर- २.८४, खुलताबाद- २.८६, फुलंब्री- १.७४ घट झाल्याचे निदर्शनास येते.

घर तिथं बोअर, पुनर्भरणाचा संकल्प कराशहरात जमिनीत पाणी साठविण्याऐवजी उपसाच सुरू आहे. हजारो बोअरवेल मोडल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केलेला दिसतो. घेतलेले बोअरवेल तळ गाठत असेल तर पुनर्भरणाचा संकल्प करणे गरजेचे आहे.-डॉ. प्रशांत अवसरमल

जलसाक्षर होणे गरजेचेपाणीपातळी वाढविण्यासाठी आपणही छोटे-छोटे उपाय करू शकतो. पाण्याचे महत्त्व जनतेला पटवून देणे गरजेचे आहे. घरामध्ये विनाकारण तोटी फिरवून ते पाणी वाया घालवण्यापेक्षा ते वाचविण्यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत.-जीवन बेडवाल, वरिष्ठ भूवैज्ञानिक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी