शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

'वंचित'ची आता काँग्रेसशी बोलणी नाही; पहिली यादी ५ सप्टेंबर रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 13:05 IST

५० उमेदवारांची पहिली यादी होणार जाहीर

औरंगाबाद : ३१ आॅगस्ट ही डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आता काँग्रेसशी बोलणी होणार नाही. वंचित बहुजन आघाडीची जवळपास ५० उमेदवारांची पहिली यादी ५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, असे आज येथे वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश देखरेख समितीचे अध्यक्ष अर्जुन सलगर यांनी जाहीर केले. 

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूचना ऐकून घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. समितीचे सदस्य दीपक मोरे व अतुल बहुले यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. पहिल्या   यादीत ओबीसींमधील सूक्ष्म जातीच्या उमेदवारांचा समावेश राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

फरकच समजत नाहीबैठकीत डॉ. संदीप घुगरे यांनी भारिप- बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी यातला फरकच समजत नसल्याची तक्रार केली. हे स्पष्ट झाले पाहिजे. अन्यथा ओबीसी दूर जाऊ शकतात, असा इशारा दिला. मात्र यावर देखरेख समितीने खुलासा केला नाही. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे. त्यात भारिप- बहुजन महासंघ लवकरच विलीन होईल, असे ते म्हणाले. वंचितचा विरोधी पक्षनेता होईल, असं  मुख्यमंत्री सांगताहेत पण आता वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील, हे लक्षात ठेवा, असे अ‍ॅड. सुभाष माने यांनी जाहीर केले. 

ओबीसींचे आरक्षण हटविण्याचा डाव.... संघप्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करा म्हणताच महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी केल्याचा जीआर काढणं हा योगायोग नाही. याबद्दल जनजागृती करणं हेही आमच्या समितीचं काम असल्याचं सलगर यांनी सांगितले. रवी तायडे यांनी सूत्रसंचालन केले. महेश निनाळे, बाबासाहेब पवार, उद्धव बनसोडे, श्रीरंग ससाणे, जया गजभिये, रेखा उजगरे, डॉ.शरदचंद्र वानखेडे आदींनी यावेळी मते मांडली.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद