शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘आरटीओ’च्या वाहनांनाच नाही इन्शुरन्स, पीयूसी; इतरांना दंड, कार्यालयीन वाहनांकडे दुर्लक्ष

By संतोष हिरेमठ | Updated: March 9, 2023 18:54 IST

नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, आरटीओ कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी ज्या वाहनांच्या मदतीने प्रवास करतात, ज्यातून इतरांवर कारवाई करतात, त्या वाहनांनाच इन्शुरन्स, पीयूसी नसल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार देशभरात जवळपास ४० ते ५० टक्के वाहने इन्शुरन्स नसतानाही धावत आहे. नियमानुसार प्रत्येक वाहनाचा थर्ड पार्टी विमा असणे आवश्यक आहे. यातून अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी मदत होते. ‘पीयूसी’मुळे प्रदूषण नियंत्रणाला हातभार लागतो. तसेच भंगार वाहने रस्त्यावर धावण्यापासून रोखताही येतात. त्यामुळे पीयूसी, इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. आरटीओ कार्यालयाचे पथक ज्या वाहनांतून प्रवास करतात, त्या वाहनांची काय स्थिती आहे, याची पडताळणी ‘वाहन’ ‘परिवहन’ या संकेस्थळाच्या आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून करण्यात आली. तेव्हा आरटीओ कार्यालयाचीच काही वाहने पीयूसी आणि ‘इन्शुरन्स’विनाच धावत असल्याचे आढळून आले.

किती वर्षे इन्शुरन्सकडे दुर्लक्ष?एका वाहनाचे इन्शुरन्श २०११ नंतर नसल्याची ॲपची ऑनलाइन यंत्रणा दाखवित आहे, तर अन्य एका चारचाकीचा इन्शुरन्स २०२१ पर्यंत वैध होता, असे दर्शविते. ‘वाहन’ ‘परिवहन’ या संकेतस्थळावर इन्शुरन्शची स्थितीच दाखवत नाही. फिजिकली डाक्युमेंट पाहावे, अशी सूचना दर्शविली जाते.

काय आढळून आले?१) वाहन क्रमांक- एमएच-०४, इपी-२२००या चारचाकी वाहनाची नोंदणी २६ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेली आहे. फिटनेसची मुदत २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे. परंतु, या वाहनाचे इन्शुरन्स आणि पीयूसी या दोन्हींची मुदत संपलेली आढळून आले. मोबाइल ॲपबरोबर शासनाचा संकेतस्थळावरून ही बाब समोर आली.२) वाहन क्रमांक- एमएच-०४, इपी-२०२०या चारचाकी वाहनाची नोंदणी २२ जून २०१० मध्ये झालेली आहे. या चारचाकीची २१ जून २०२५ पर्यंत फिटनेसची मुदत आहे. तसेच ८ जुलै २०२३ पर्यंत पीयूसीची मुदत आहे. परंतु, या वाहनांचे इन्शुरन्सच नसल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद