वाळूज महानगर : भिशीत सहभागी सभासदांनी पैशासाठी तगादा लावून घर बळकावल्यामुळे निराश झालेल्या विटावा गावातील भिशीचालकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्यामुळे वाळूज परिसरात खळबळ उडाली आहे.बाबासाहेब संपत सोमासे हे कुटुंबियांसमवेत विटावा (ता.गंगापूर) येथे सात वर्षांपासून वास्तव्यास होते. तीन वर्षांपूर्वी बाबासाहेब यांनी गावात महिलांची भिशी सुरू केली होती. गावातील १२ महिला सहभाग घेऊन बाबासाहेब यांच्याकडे भिशीचे पैसे जमा करीत होत्या.अलीकडे बाबासाहेब यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे त्यांनी महिला सभासदांना पैसे दिले नव्हते. त्यामुळे सभासदांनी सारखा तगादा लावला होता. जुळवाजुळव झाल्यावर पैसे देतो, असे त्यांनी सभासदांना सांगितले होते. मात्र, तगादा थांबत नसल्यामुळे बाबासाहेब तणावाखाली होता.
भिशीचालकाची आत्महत्या
By admin | Published: November 14, 2015 12:42 AM