शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

निष्काळजीपणाचे बळी! लोंबकळणाऱ्या वायरमधून बसला विजेचा धक्का; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 23:24 IST

कन्नड येथील हिवरखेड शिवारात ८ जुलै रोजी विद्युतवाहिन्या जोडताना विजेचा धक्का बसून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दोन सख्ख्या भावांचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शिऊर (औरंगाबाद):  बोअरवेलसाठी घेतलेले वायर बैलांच्या शिंगात अडकून बैलगाडीत वीजप्रवाह उतरून बसलेल्या धक्क्याने दोन सख्या वृद्ध भावांचा आणि बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मौजे बायगाव (तालुका वैजापूर) येथील चेळेकर शेत वस्ती परिसरात घडली. साहेबराव गणपत चेळेकर आणि बाबुराव गणपत चेळेकर अशी मृत भावांची नावे आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, वैजापुर तालुक्यातील मौजे बायगाव येथील चेळेकर वस्तीवर एकत्र कुटुंब राहत असलेले साहेबराव गणपत चेळेकर हे बुधवारी संध्याकाळी पाऊस उघडल्यानंतर शेतातील कामे उरकून जुना बायगाव- देवगाव रंगारी या गाडी वाटीने लोखंडी एका बैलाच्या बैलगाडीने घरी परतत होते. या रस्त्यावरून एका शेतकऱ्याने बोअरवेलसाठी विनापोल केबल टाकले होते. हे केबल बैलाच्या शिंगात अडकल्याने त्यातील वीजप्रवाह बैलगाडीत उतरला. विजेच्या धक्क्याने प्रथम बैलगाडीस जुंपलेला बैल ठार झाला. त्यानंतर बैलगाडी चालवणारे साहेबराव विजेच्या धक्क्याने ठार झाले. 

दरम्यान, मोठा आवाज झाल्याने बाजूस काम करत असलेले साहेबराव यांचे भाऊ बाबुराव लागलीच मदतीला धावले. मात्र, यावेळी वीजप्रवाह उतरलेल्या बैलगाडीस स्पर्श झाल्याने बाबुराव यांचाही जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा करत इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तात्काळ वीज पुरवठा खंडित केला.

घटनेची माहिती मिळताच शिवुर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप पाटील, पोलिस उपनिरीक्षक ऐ.जे.नागटिळे, पोलिस कर्मचारी जाधव, पवार यांनी देवगाव रंगारी ग्रामीण रुग्णालयात येऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद शिवुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोघेही मयत भांवाची गुरूवारी उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. 

दरम्यान, मयत साहेबराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली सुना नातु पणतु असा तर मयत बाबुराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. कन्नड येथील हिवरखेड शिवारात ८ जुलै रोजी विद्युतवाहिन्या जोडताना विजेचा धक्का बसून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दोन सख्ख्या भावांचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू