शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Video: पवारांचं मन डांबरापेक्षाही काळं, त्यालाही लाज वाटेल, उद्धव ठाकरेंची जहरी टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 21:41 IST

पवारांना थोडं डांबर आणून देतो पण त्या डांबरालाही लाज वाटेल, कारण डांबरापेक्षा शरद पवारांचे मन काळं आहे अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. 

औरंगाबाद - राजीव गांधींच्या काळात शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा सांगितलं होतं की एकवेळ मी भस्म लावेन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, मग भस्म जपून ठेवा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भस्म घेऊन हिमालयात जायचे आहे. शरद पवारांना थोडं डांबर आणून देतो पण त्या डांबरालाही लाज वाटेल, कारण डांबरापेक्षा शरद पवारांचे मन काळं आहे अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जयंत पाटील बोलतात शिवसेनेने भाजपला मिठी का मारली. मग काय तुम्हाला मिठी मारायची होती. शरद पवारांनी काँग्रेसची युती तोडली तेव्हा म्हणाले की मी यापुढे काँग्रेसमध्ये जाणार नाही एक वेळेस तोंडाला काळ लावीन पण पुन्हा काँग्रेस नाही. शरद पवार तुम्हाला थोडा डांबर लावू का ? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 

मराठवाड्यात पंतप्रधान आले होते. युती ही महाराष्ट्रासाठी केली. मराठवाड्यासाठी केली. मतदान झाल्यानंतर जी वचने दिलेली आहेत ती सर्व कामे झाली पाहिजेत. मुला-मुलींच्या लग्नाच्या चिंतेमुळे दारिद्र्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. गरीब शेतकऱ्यांना यांच्या मुला मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे शिवसेनेकडून आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न आहे. तुमच्या हक्काचा पाणी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

नावापुढे राष्ट्रवादी लावून कोणी राष्ट्रवादी होत नाही. युती ही माझ्या महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी केली. केंद्रात, राज्यात आपले सरकार येणारच, मतदानानंतर ताबडतोबत दुष्काळावर काम करणार आहोत. जात पात धर्म आणि मानत नाही. मी जर खोटं बोललो तर शिवसेनाप्रमुख कधीच माफ करणार नाहीत. आम्ही हिंदुत्वासाठी काम करतो. एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेस हे कशासाठी काम करतात माहीत नाही. मत मागणारे कोणाचे वारसदार आहेत हे जनतेने पाहावं असं उद्धव यांनी सांगितले. 

जो शिवसेनेशी गद्दारी करेल त्याचा शिवसेनेशी काहीही नात राहणार नाही. माझा युतीचा निर्णय तुम्हाला पटलेला आहे की नाही. असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केला. तसेच 56 पक्ष युतीला गाडण्यासाठी एकत्र आले आहेत. छप्पन्न पिढ्या जरी वरून खाली उतरला तरी आम्हाला गाडू शकणार नाहीत असा घणाघात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार