शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विधानसभा अध्यक्षांनी फुलंब्रीतूनच केले ३ आमदारांचे राजीनामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:50 IST

अध्यक्षही निवडणुकीच्या प्रचाराला लागल्यामुळे ते सध्या मुंबईऐवजी फुलंब्री मतदारसंघात जनसंपर्कात अडकलेले आहेत.

ठळक मुद्देधावपळीत जाधवांचा राजीनामा पक्षप्रवेश सोहळ्याची लगीनघाई

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजपामध्ये सध्या पक्षांतर करून येणाऱ्यांची भरती जोरदार सुरू आहे. पक्षांतर करून युतीमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना विद्यमान आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्यामुळे त्यांना मुंबईऐवजी औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यात यावे लागले आहे. आणखी किती जणांचे राजीनामे धावपळीत मंजूर होतील, हे पक्षांतर करणारे जेव्हा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या द्वारी येतील, तेव्हाच स्पष्ट होईल. शुक्रवारी राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा फुलंब्री मतदारसंघातील कुंभेफळ या गावी येऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सोपविला. त्यांनी तो तातडीने मंजूर केला. राजीनाम्यानंतर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. 

बार्शीचे दिलीप सोपल, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि शुक्रवारी रत्नागिरीतील जाधव या तिन्ही लोकप्रतिनिधींना औरंगाबादेत येऊन राजीनामा द्यावा लागला. लोकप्रतिनिधींना पक्षांतर करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा द्यावा लागतो. अध्यक्षही निवडणुकीच्या प्रचाराला लागल्यामुळे ते सध्या मुंबईऐवजी फुलंब्री मतदारसंघात जनसंपर्कात अडकलेले आहेत. त्यामुळे विशेष विमानाने, कारने पक्षप्रमुखांनी नेमलेल्या जबाबदार नेत्यांसह पक्षांतर करणारे लोकप्रतिनिधी मुंबईतून थेट फुलंब्रीत येत आहेत. काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेल्या लोकप्रतिनिधींना अशी धावपळ व आटापिटा करावा लागला आहे. विशेष म्हणजे हे सगळे होत असताना विधानसभा अध्यक्षही जमेल त्या पद्धतीने प्रोटोकॉल मोडून धावपळ करीत संबंधित आमदारांचा राजीनामा मंजूर करीत आहेत. दिलीप सोपल यांचा राजीनामा धावपळीत मंजूर करण्यात आला, तसेच अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मुलाच्या हस्ते अध्यक्षांकडे पाठविण्यात आला, तोदेखील तातडीने मंजूर करण्यात आला.

विधानसभा अध्यक्षांची धावपळ शुक्रवारी भास्कर जाधव हे विशेष विमानाने औरंगाबादेत आले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, अनिल परब, आ. अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे होते. विधानसभा अध्यक्षांना गाठण्यासाठी त्यांनी फुलंब्री मतदारसंघ गाठला. बागडे हे कुंभेफळ परिसरात होते. त्यांचा ताफा शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे येत असताना कुंभेफळचे रेल्वेफाटक बंद झाले. त्यामुळे बागडे यांनी दुचाकीवरून शेंद्रा परिसरातील एक कार्यालय गाठले. तेथे जाधव यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना रवाना केले. राजीनामा मंजुरीसाठी हा आटापिटा, धावपळ पहिल्यांदाच बघितल्याची भावना कुंभेफळ परिसरात होती.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपाMLAआमदारShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस