शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

कोट्यवधींच्या उत्पन्नानंतरही प्रवाशांना सुविधांची ‘वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:11 IST

कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत असल्याची ओरड होत आहे.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल ४८६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. गतवर्षीपेक्षा ६.६० टक्क्यांनी यंदा उत्पन्न वाढले आहे. मात्र, कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत असल्याची ओरड होत आहे.

भारतात पहिल्यांदा १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान रेल्वे धावली. हा क्षण लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी रेल्वे सप्ताह साजरा करते. नांदेड विभागात मंगळवारी हा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी यानिमित्ताने नांदेड विभागाच्या वर्षभरातील कामगिरीची माहिती दिली. वर्षभरात केवळ प्रवासी वाहतुकीतून ३६८.५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हे ७.७७ टक्क्यांनी अधिक आहे. नांदेड विभागात तिकीट तपासणीतून ६.७१ कोटींचा महसूल मिळाला आहे. तब्बल ४२६ लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर १.६३ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

नॉन इंटर लॉक वर्किंग करून मुदखेड ते मुगट आणि मालटेकडी-नांदेड-लिंबगावदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार आहे.रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले, कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुकुंदवाडी, लासूर स्टेशनला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, उत्पन्न घेतल्यानंतर त्या बदल्यात प्रवाशांना सुविधा दिल्या पाहिजे. मुकुं दवाडी येथे प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे नाहीत, पिण्याचे पाणीही मिळत नाही. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे कामही रेंगाळले आहे.

मुंबईसाठी रेल्वे मिळेनाशहरातून मुंबईला जनशताब्दी, देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या रेल्वेमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नव्या रेल्वेची मागणी होत आहे. परंतु मुंबईतील रेल्वेगाड्यांच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेकडून परवानगी मिळत नाही, असेच सांगितले जाते. 

पीटलाईन अडगळीतपीटलाईन नसल्याच्या कारणानेही औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू होण्यास अडचण असल्याचे सांगितले जाते. प्रवासी संघटनांकडून मागणी करूनही पीटलाईनचा प्रस्ताव अडगळीत पडला आहे. जुन्या रेल्वेस्टेशनच्या इमारतीच्या विकासाचीही नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे