शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

खरीप पेरणीचे २ हजार कोटी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:30 AM

विभागातील आठ जिल्ह्यांंत खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून, ती जवळजवळ वाया गेल्यात जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना केल्यानंतर २०१६ मध्ये वरुणराजाने मराठवाड्याला थोडा दिलासा दिला; परंतु यंदा पुन्हा कमी पाऊस झाल्यामुळे मराठवाडा मेटाकुटीला आला आहे. शेतकºयांनी जून महिन्यात केलेली खरिपाची पेरणी पावसाने दडी मारल्यामुळे संपुष्टात आली आहे. विभागातील आठ जिल्ह्यांंत खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून, ती जवळजवळ वाया गेल्यात जमा झाली आहे.२०१५ साली केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्तालयाकडून विभागातील टंचाईचा आढावा घेतला होता. यंदा मात्र केंद्र आणि राज्याचे कुठलेही पथक मराठवाड्याच्या पाहणीसाठी येण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कृत्रिम पावसाची यंत्रणाही नुकतीच हलविण्यात आली.खरीप हंगाम पावसाअभावी हातून जाणार असल्यामुळे शेतकरी पुरता हताश झाला आहे. पाऊसच नसल्यामुळे दुबार पेरणीदेखील आता होणे शक्य नाही. खरीप व रबी मिळून ६२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५४ लाख हेक्टरवर सरासरी पेरणी होते. मराठवाड्यात एकूण ४९ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी अंदाजे ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. नांगरणी, पेरणी, खतांसाठी एकरी केलेल्या १० ते १२ हजार रुपयांच्या खर्चासह मजुरी आणि इतर खर्चाचा आकडा विचारात घेतला, तर विभागात खरीप पेरणीवर २ हजार कोटींहून अधिक झालेली गुंतवणूक मातीत गेली आहे. यापुढे पाऊस झाला तरी, त्यातून खरीप पीके तगण्याची चिन्हे नाहीत. परंतु पिण्यासाठी पाणी आणि फळ बागायत त्यातून जगू शकते. त्यामुळे सर्वाचे डोळे वर लागले आहेत.