शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जायकवाडी धरणातून पाणी सोडणार

By admin | Published: May 16, 2014 12:29 AM

पैठण : तालुक्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डाव्या कालव्या वरील सीआर गेट बंद करून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

पैठण : तालुक्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डाव्या कालव्या वरील सीआर गेट बंद करून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष काकासाहेब भुकेले पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. याबाबत धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने गेल्या महिनाभरापासून पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून पाणीटंचाईचे भीषण वास्तव मांडले आहे. पैठण तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिक व जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुक्यात ३५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, असे काकासाहेब भुकेले यांनी सांगितले. धरणग्रस्तांची दुर्दशा जायकवाडी धरणासाठी घरदार व सुपीक जमिनीवर पाणी सोडून त्याग केलेल्या धरणग्रस्तांच्या पदरी मोठी निराशा आली आहे. धरणग्रस्तांच्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना जायकवाडीच्या लाभक्षेत्रात १२ महिने सिंचनाची हमी देत जमिनी देण्यात आलेल्या आहेत. धरणग्रस्तांनी या जमिनीत पाणी आणण्यासाठी डाव्या व उजव्या कालव्यावरून ४ ते ५ किलोमीटर अंतरापर्यंत पाईपलाईन टाकल्या व त्या आधारे जमिनीवर फळबागा, ऊस अशी पिके घेतली आहेत; मात्र कालव्यात पाणी नसल्यामुळे पिण्यासाठीच पाणी मिळेना तिथे पिकांना कोठून पाणी देणार अशी अवस्था शेतकर्‍यांची निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील पिके आठवडाभर जगतील असे चित्र निर्माण झाले आहे. सीआर गेट दाबून पाणी सोडा डाव्या कालव्यावरील गोपेवाडी व विहामांडवा येथील सीआर गेट (काट दरवाजे) (क्रॉस रेग्युलर गेट) बंद करून धरणातून पाणी सोडल्यास कालव्यात पाणीसाठा होऊन ४२ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो व या भागात सुरू असलेल्या टँकरचा खर्च वाचू शकतो. यामुळे तातडीने या कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी या भागातील धरणग्रस्तांसह नागरिकांनी केली आहे. २६ रोजी गेट बंद आंदोलन जायकवाडी प्रशासनाने दि. २२ रोजी कालव्यात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे, असे असले तरी प्रशासन याबाबत चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे. दि. २२ रोजी पाणी न सोडल्यास दि. २६ रोजी हजारो शेतकर्‍यांसह जाऊन जायकवाडी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा काकासाहेब भुकेले यांनी दिला आहे. (वार्ताहर) या गावांना होईल फायदा सीआर गेट दाबून कालव्यात पाणी अडविल्यास, कातपूर, नारायणगाव, मुधलवाडी, पैठण, आखतवाडा, करंजखेडा, सोलनापूर, रहाटगाव, पंथेवाडी, वाघाडी, वडवाळी, गोपेवाडी, ज्ञानेश्वरवाडी, माळवाडी, सायगाव, आपेगाव, आगर नांदर, डेरा, इंदेगाव, ब्रह्मगाव, हिंगणे, विहामांडवा, चिंचाळा, नवगाव, तुळजापूर, रामनगर, आवडे उंचेगाव, घेवरी टाकळी, अंबड, हिरडपुरी अशी डाव्या कालव्यावरील ३१ गावे व उजव्या कालव्यावरील सोनवाडी, तांदूळवाडी, जायकवाडी, तेलवाडी, चनकवाडी, दादेगाव जहांगीर, दादेगाव चांगतपुरी, सायगाव, खडका, मडका अशा ४९ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो.