शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

३.२९ मीटरने घटली पाणीपातळी

By admin | Published: February 17, 2016 12:18 AM

लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या १०९ विहिरींतील सर्वेक्षणावरून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ३.२९ मीटरने पाणीपातळीत घट झाली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ४.४९ मीटरने पाणीपातळी घटली आहे. अहमदपूर तालुक्यातील १५, औसा १५, चाकूर ७, लातूर १८, निलंगा १७, शिरूर अनंतपाळ ५, रेणापूर ११, उदगीर ९, जळकोट ४, देवणी ८ अशा एकूण १०९ विहिरींचे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत करण्यात येते. दर तीन महिन्याला सर्वेक्षण केले जात असल्यामुळे किती मीटरने पाणीपातळीत घट झाली, हे लक्षात येते. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत औसा तालुक्यात २.७८, चाकूर तालुक्यात ३.६०, लातूर तालुक्यात ३.४९, निलंगा २.८३, शिरूर अनंतपाळ २.८१, रेणापूर २.६४, उदगीर ३.२७, जळकोट ४.४२, देवणी २.५२ तर अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ४.४९ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. सरासरी जिल्ह्याच्या पाणीपातळीत ३.२९ मीटरने घट झाली आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात असल्याने विंधन विहिरींचे पाणीही गायब होत आहे. (प्रतिनिधी)