शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
2
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
3
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
4
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
5
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
6
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
7
Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'
8
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
9
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
10
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
11
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
12
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
13
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
14
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
15
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
16
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
17
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
18
Chris Gayle, LLC 2024 Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
19
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
20
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन

आठवड्यातून एकदा पाणी, ते सुद्धा वेळेवर नाही; छत्रपती संभाजीनगरात नागरिक प्रचंड त्रस्त

By मुजीब देवणीकर | Published: December 01, 2023 6:55 PM

पाणीपुरवठ्याची अत्यंत बिकट, कालबाह्य यंत्रणा असतानाही आम्ही पाणी देतोय, असा प्रशासनाचा तोरा आहे.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी देत आहे. त्यातही पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नाही. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी पाणी येते. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना पाण्याच्या दिवशी इतर कामे बाजूला ठेवावी लागतात. पाण्यासाठी अनेकदा लग्न कार्य, दु:ख प्रसंगातही कुठे ये-जा करता येत नाही. नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाशी प्रशासनाला काहीच देणेघेणे नाही. उलट पाणीपुरवठ्याची अत्यंत बिकट, कालबाह्य यंत्रणा असतानाही आम्ही पाणी देतोय, असा प्रशासनाचा तोरा आहे.

शहराला सध्या २२० एमएलडी पाण्याची दररोज गरज आहे. महापालिका जायकवाडीतून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात आणते. कागदावर येणारे पाणी आणि शहराची मागणी याची गोळाबेरीज केली तर मोठी तफावत दिसते. अनेक तज्ज्ञांनी यावर काथ्याकूट केला. मात्र, प्रशासन नियोजनात आम्ही कमी पडतोय, हे मान्य करीत नाही. त्यामुळे शहरातील ८० टक्के वसाहतींना ७ व्या दिवशी उर्वरित वसाहतींना ८ व्या आणि ९ व्या दिवशी पाणी मिळते. ‘लोकमत’ने शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांकडे पाणी कितव्या दिवशी येते, याची विचारणा केली. बहुतांश नागरिकांचे आठवड्यातून एकदाच, असे उत्तर होते.

३६५ पैकी ४८ दिवस पाणीवर्षातून फक्त ४८ दिवस महापालिका नागरिकांना पाणी देते. कोणत्या वसाहतीला किती वेळ पाणी द्यायचे हे कागदावर लिहिलेले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळीच असते. कोणाला ४ तास तर कोणाला ८ तास पाणी देण्यात येते. या वसाहती कोणत्या, हे पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.

म्हणून पाणीपट्टी भरेनातपूर्वी पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये होती. दोन वर्षांपूर्वी पाणीपट्टी २ हजार ५० रुपये करण्यात आली. त्यानंतरही नागरिक पाणीपट्टीच भरत नाहीत. दरवर्षी पाणीपुरवठ्यावर मनपाला १२० ते १३० कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्या तुलनेत पाणीपट्टी २० कोटीही वसूल होत नाही.

अनेक वॉर्डात राजकारण वेगळेचकाही माजी नगरसेवक वॉर्डातील नागरिकांना दुपारी ३ वाजता पाणी येणार असा मेसेज मोबाईलवर पाठवतात. पण पाणी लवकर किंवा उशिरा येते. कारण माजी नगरसेवकाचे विरोधक मेसेजला खोडून काढण्यासाठी लाइनमनला हाताशी धरतात. याचा त्रास सर्वसामान्यांना होतोय, याची जाणीव कोणालाच नाही.

नागरिकांची मोजणीच चुकीचीज्या दिवशी पाणीपुरवठा होतोय, तो दिवस मोजायचा नाही. त्यानंतर पाच दिवस, सहा दिवस गॅप असतो. शहरात सध्या चार आणि पाच दिवसांआड पाणी देतोय. उलट काही भागात एक दिवस आणखी कमी केला. वेळेचेही काटेकोर पालन करतोय. तांत्रिक बिघाड, अडचण निर्माण झाली तरच वेळ मागेपुढे होतो.- के. ए. फालक, कार्यकारी अभियंता, मनपा.

कोणत्या भागात पाणी कधी?वसाहत-------कितव्या दिवशीएन-२ सिडको- ६ईटखेडा-नक्षत्रवाडी-७रामनगर-मुकुंदवाडी-८हडको एन- ११ परिसर - ७गारखेडा-शिवाजीनगर-७दिवाणदेवडी-शहागंज-७ब्रिजवाडी-नारेगाव- ८सिडको एन-८ परिसर --७गणेश कॉलनी-रशीदपुरा ९भडकलगेट-टाऊन हॉल- ६सिडको एन-६ परिसर --६गुलमंडी-धावणी मोहल्ला-८आकाशवाणी-त्रिमूर्ती चौक-७किराडपुरा-रहेमानिया कॉलनी- ९बारी कॉलनी परिसर- ८भवानीनगर- मोंढा- ८भीमनगर-भावसिंगपुरा-७आरेफ कॉलनी- ८

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी