शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बीड जिल्ह्यात पाणीसाठा वाढणार, पिकं बहरणार; ३१ प्रकल्पांतून निघाला १२ लाख घनमीटर गाळ

By शिरीष शिंदे | Updated: December 20, 2023 19:04 IST

धरणातून उपसा करण्यात आलेला गाळ शेतामध्ये पसरविण्यात आला आहे.

बीड : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत मागील जवळपास ४ महिन्यांच्या कालावधीत लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून ४४ प्रकल्पांतून १२ लाख ३४ हजार ५८२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. परिणामी, पुढील पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर जेवढा गाळ काढला आहे तेवढाच पाणीसाठा या प्रकल्पात होणार असल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात आली. यासाठी लोकसहभाग व अवनीच्या माध्यमातून हा गाळ काढण्यात आला आहे. यासोबतच नदी खोलीकरण व रुंदीकरणातूनसुद्धा गाळ काढण्यात आला आहे. सदरील योजनेमध्ये जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन शेतामध्ये तलावातील गाळ स्वतःच्या जमिनीमध्ये पसरलेला आहे. योजनेमध्ये लोकसहभाग तसेच अशासकीय संस्थेमार्फत गाळ काढण्यात आला असून जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. सदरील योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची कामे सुरू असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तलावातून गाळ उपसा करण्यात येत आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतजमिनीला नवसंजीवनी देणारी ठरत आहे.

कृषी उत्पादनात होणार भरीव वाढगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरणातील गाळ घेऊन जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले होते. त्यामुळे एकूण ४५ प्रकल्पांतील लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरण, रुंदीकरणातून १२ लाख ३४ हजार ५८२ घनमीटर गाळ काढून ४२० हेक्टर शेतजमिनीवर पसरविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जमिनीची सुपीकता वाढीबरोबर एकूण ४५ प्रकल्पांमध्ये ४२.०८ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण होऊन तलावाची मूळ सिंचन क्षमता पुनर्स्थापित झाली आहे. पुनर्स्थापित सिंचन क्षमतेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच कृषी उत्पादनातही भरीव वाढ होणार आहे.

लोकसहभाग, अवनी व नदी खोलीकरणातून काढलेला गाळतालुका-प्रकल्प संख्या-काढलेला गाळकेज-७-५८४८२-९७माजलगाव-३-१२६३८६.६-१७४आष्टी-१९-२५०७६०.५१-२२८पाटोदा-७-८७००१.४-१५३शिरूर-२-५२१६४-३१बीड-२-१३६२५२-२३वडवणी-१-६२२-३धारूर-२-२९७७२-३१परळी-१-६७६०६.९८-१८गेवराई-०-४२५५३५-०एकूण-४४-१२३४५८२२.८८-७५८

शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादाधरणातून उपसा करण्यात आलेला गाळ शेतामध्ये पसरविण्यात आला आहे. गाळाच्या ३५.७५ रुपये प्रति घनमीटर प्रमाणे एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत एकरी अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान फक्त अडीच एकरपर्यंत म्हणजेच ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत देय राहील. विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनासुद्धा ही मर्यादा लागू करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्रDamधरण