शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

पावसाळ्यातही पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:19 AM

खुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. तालुक्यातील पाच गावांना टँकरने तर सहा गावांना विहीर अधिग्रहण करून प्रशासनाने शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाऊस नसल्याने पिके करपली आहेत. सर्वच जण पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. तालुक्यात आतापर्यंत फक्त २२.६० टक्केच पाऊस पडला आहे.खुलताबाद तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला होता. त्यानंतर पाऊस जो गायब झाला तो परत आलाच नाही. मध्यंतरी रिमझिम पावसाने पिके कशीबशी तग धरून उभी होती. परंतु गेल्या २५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पिके करपू लागली आहेत. जमिनीतील पाणीसाठा खोलवर गेल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे टँकर सुरू करावे, म्हणून ग्रामपंचायतीने तालुका पंचायत समिती कार्यालयास पाणीटंचाईचे प्रस्तावही दाखल केले; परंतु ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या युक्तीप्रमाणे कागदी घोडे मिरविण्याचे काम सुरू आहे. पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तालुका प्रशासनाने शुक्रवारपासून गदाना, बोरवाडी, भडजी, ममनापूर, विरमगाव या पाच गावांना शासकीय पाण्याचे टँकर सुरू केले आहेत तर टाकळी राजेराय गावास ३ विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर बोरडमई , पळसगाव, लामणगाव, सराई येथे विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील खिर्डी, मावसाळा गावातही पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायत सोमवारी टँकरसाठी पंचायत समिती कार्यालयास प्रस्ताव दाखल करणार आहे. अशीच काही परिस्थिती तालुक्यातील इतर गावात निर्माण झाली असल्याने मुसळधार पाऊस न पडल्यास भरपावसाळ्यात टँकरची संख्या आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.तालुक्यात १३ आॅगस्टअखेर फक्त १७८ मि.मी. इतकाच म्हणजे २२.६० टक्केच पाऊस झाला असून तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९.५० इतकी असून गेल्यावर्षी आतापर्यंत ४०३ मि.मी पाऊस झाला होता. पंरतु यंदा पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया जाणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण दिसू लागले आहे.