शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी

By विजय सरवदे | Published: May 09, 2024 4:24 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न असून, दुसरीकडे ग्रामीण नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ४५९ गावांना ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिलांना कामधंदे सोडून दिवसभर टँकरच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागत आहे.

दिवसेंदिवस पाणीटंचाईचा चटका तीव्र होत असून, महिनाभरातच १२३ गावे टंचाईच्या विळख्यात आली आहेत. मागच्या महिन्यात २९८ गावे आणि ४८ वाड्यांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या महिन्यात उष्णतेचा पारा सारखा वरती सरकत असल्याने गाव परिसरातील विहिरी, हातपंप, तलावांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३९८ गावे, ६१ वाड्या, असे मिळून ४५९ गावे तहानलेली आहेत. त्यावर जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना राबविण्यात येत असून, ६४६ टँकरच्या १२३७ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाळ्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे बहुतांश स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. नागरिकांनाच नव्हे, तर जिल्ह्यातील जनावरांनाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी फक्त सोयगाव तालुक्यात पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या एकाच तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित आठही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी खुलताबाद तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ८६ गावे, पैठण तालुका- ७९, छत्रपती संभाजीनगर तालुका- ८२, वैजापूर तालुका- ८८, फुलंब्री-५१, सिल्लोड- ४५, खुलताबाद- ५ आणि कन्नड तालुक्यातील २३ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

३४० विहिरींचे अधिग्रहणजि. प. पाणीपुरवठा विभागाने तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील २७४ गावांतील ३४० विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींतील पाणी शेती किंवा अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई