शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात- नायक

By admin | Published: November 10, 2014 11:35 PM

जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे

जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करुन घेण्याबरोबरच मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. पाणी पुरवठ्या संदर्भात एकाही नागरिकांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आज येथे आयोजित पाणी टंचाई व चारा टंचाई संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) एन.आर. शेळके, जालन्याचे उप विभागीय अधिकारी मंजुषा मुथा, भोकरदनचे उप विभागीय अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, अंबडचे उप विभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, परतूरचे उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार छाया पवार, रूपा चित्रक, रेवनाथ लबडे, अभय चव्हाण, महेश सावंत, भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार सोनाली जोंधळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे, वरिष्ठ भू- वैज्ञानिक प्रकाश शेलार, उप विभागीय कृषी अधिकारी ए.आर. देशमुख, बी.एम. रोकडे, श्री जोशी, जारवाल यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, जिल्ह्यात पाणीटंचाई तसेच चाराटंचाईवर मात करण्यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करुन घ्याव्यात. यामध्ये नवीन विंधन विहिर, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नळ योजना, तात्पुरती पूरक योजना, खाजगी विहिर अधिग्रहण करणे, बुडकी घेणे, जलभंजन करणे तसेच मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी कामे करण्याबरोबरच तांत्रिक कारणाअभावी बंद असलेल्या योजना तातडीने दुरुस्त करुन घ्याव्यात. विद्युत पुरवठ्या अभावी ज्या ठिकाणच्या पाणी पुरवठा योजना बंद असतील त्या तातडीने सुरु करण्यात याव्यात. तसेच नादुरुस्त असलेले हातपंपही दुरूस्त करुन घ्यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करावी व अनाधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.