शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:40 IST

अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

ठळक मुद्देसर्व खर्चास फाटा दिला छावणीत पार पडला लग्नसोहळा 

औरंगाबाद : शहरात सध्या लग्नसराईची धुमधाम सुरू असून, प्रत्येक लग्नसोहळ्यात वऱ्हाडींना पंचपक्वान्नांचे शाही भोजन दिले जात आहे. मात्र, छावणीत रविवारी एका लग्नात चक्क वऱ्हाडींनी घरूनच जेवणाचे डबे आणून तेथे जेवण केले. कारण, वधू-वर पित्यांवर लग्नाचा कोणताही भार पडू नये. अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

छावणीतील जैस्वाल मंगल कार्यालयात दुपारी १.३० वाजता लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. पैठण तालुक्यातील जांभळी येथील वनिता चव्हाण व वाशिम येथील शेगी गावातील सुनील राठोड यांच्या विवाहासाठी शेकडो वऱ्हाडी जमले होते. मात्र, कोणत्याही प्रकारचे बॅण्डपथक, डीजेचा दणदणाट नाही. वरात नाही, मंगलाष्टक म्हणण्यात आले नाहीत. लग्नासाठी येणारा प्रत्येक जण संत रामपालजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन खाली सतरंजीवर बसत होता. 

केवळ धागा बांधून विवाह ठरलेल्या वेळी वधू-वर आले. त्यांनी एकमेकांना हार न घालता केवळ धागा बांधला आणि रमैनी (दुपारची आरती) सुरू झाली. अवघ्या १७ मिनिटांत विवाह सोहळा पार पडला. यानंतर वधू-वराला उपस्थित वऱ्हाडींनी भावी आयुष्याबदल शुभेच्छा दिल्या. लग्नात कोणताही खर्च न करण्याचा ठरविल्याने जेवणावळीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. वऱ्हाडींनी घरूनच अन्नपाणी आणले होते. अनेक जण वधू-वराला आशीर्वाद देऊन निघून गेले. कोणत्याही प्रकारचा भेटवस्तू, हारतुऱ्यांचा वापर येथे करण्यात आला नाही. 

असे विवाह अधिक व्हावेत नवरदेवाचे वडील रामजीदास चव्हाण म्हणाले की, आमच्या गुरूच्या शिकवणीनुसार आम्ही हुंडा न घेता, संसारोपयोगी वस्तू न घेता-देता,अहेर, प्रतिअहेर, असे काहीही न घेता, तसेच कोणताही अतिरिक्त खर्च न करता विवाह पार पाडला आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तो प्रकार रोखण्यासाठी अशा पद्धतीचे विवाह काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

अनिष्ट चालीरीतींना फाटा देण्यासाठी रमैनी विवाह रमैनी विवाहात वधू-वर पित्याला कुठलेही कार्यालय भाडे, वीज बिल, सफाई खर्च आदी द्यावे लागत नाही. विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यात येते. विवाह सोहळा सत्संगामधील एका १७ मिनिटांच्या आरतीने पार पडतो.  रमैनी विवाहामुळे समाजाचा कर्जबाजारीपणा, आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या कमी होतील, समाजप्रबोधनासाठी असे विवाह होणे अपेक्षित असून, आज काही जणांनी त्यांच्या मुला-मुलींचे विवाह असेच करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती अशोकदास आव्हाड यांनी दिली. 

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक