शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
8
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
9
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
10
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
11
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
12
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
13
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
14
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
15
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
16
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
17
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
18
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
19
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
20
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच

By सुमित डोळे | Published: June 26, 2024 3:11 PM

मनपाला बेशिस्त वाहतुकीचे सोयरसुतक नाही, जी-२० मध्ये ५० कोटींचा खर्च, अधिकाऱ्यांच्या दालनांवर लाखोंची उधळण, वाहतूक व्यवस्थेचे मात्र तीनतेरा,

छत्रपती संभाजीनगर : आठ वर्षांपूर्वी शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. त्यानंतर शहरात अनेक विकासकामे सुरू झाल्याचा दावा मनपाने केला. जी-२० दरम्यान शहराच्या सुशोभीकरणावर कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र, शहराची वाहतूक व्यवस्थेवर खर्चासाठी मनपाच्या स्मार्ट सिटी विभागाला सपशेल विसर पडला. स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीची धुरा असलेली सिग्नल तब्बल ३० वर्ष जुनाट व निष्क्रिय झालेली आहे. परिणामी, संपूर्ण शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले असताना मनपाला मात्र त्याचे सोयरसुतक नाही, हे विशेष.

जून २०१५ मध्ये लाँच झालेल्या स्मार्ट सिटी मिशनद्वारे नागरिकांना मुख्य पायाभूत सुविधा, स्वच्छ वातावरण, स्मार्ट जीवनाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रतिवर्ष सुमारे १०० कोटींचा निधी यातून शहरांना देण्याचे नियोजित होते. शहरात स्मार्ट सिटी योजनेतून ७०० कोटींपेक्षा अधिक मोठ्या प्रकल्पांचे नियोजन करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न अधिकाऱ्यांनी दाखवले. मात्र, यात शहराची प्रतिमा अवलंबून असलेल्या वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. पोलिसांच्या मते, वाहनांची संख्या लोकसंख्येच्या ६० टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. एकीकडे शहरात वाहनांची संख्या भरमसाठ वाढत असताना तुलनेत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रभावी व्यवस्थाच उभी केली गेली नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली.

यासाठी इच्छाशक्तीच नाहीराज्यातील अन्य स्मार्ट सिटी असलेल्या वाहतूक समिती कार्यरत आहे. त्यात मनपा आयुक्त, अभियंत्यांसह, वाहतूक अभियंत्यांचा समावेश असतो. ठराविक कालावधीनंतर या समितीची बैठक होऊन शहराच्या वाहतूक समस्यांवर चर्चा व उपाययोजना ठरवले जाते. शहरात मात्र मनपाकडे वाहतूक अभियंता असे पदच नाही. शिवाय, गेल्या तीन वर्षांपासून मनपा प्रशासक वा अन्य अधिकाऱ्यांनी वाहतुकीच्या समस्यांसाठी एकही बैठक बोलावली नाही.

अशी आहे सिग्नलची अवस्था :येथे ३० वर्षे जुने सिग्नल-बाबा पेट्रोल पंप, पंचवटी, नगरनाका, हॉटेल अमरप्रीत, मोंढा नाका, आकाशवाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, सूतगिरणी, गजानन महाराज मंदिर, जुने हायकोर्ट, हॉटेल कार्तिकी, मिल कॉर्नर, रेल्वेस्टेशन चौक, सिल्लेखाना, समर्थनगर, जुब्ली पार्क, बलवंत चौक, क्रांतीचौक, महानुभव आश्रम, नवीन हायकोर्ट चौक, एस.बी.ओ.ए. चौक, सिडको बसस्थानक, मुकुंदवाडी, एन-१ चौक, टी. व्ही. सेंटर चौक, शरद टी पॉईंट, बजरंग चौक, आंबेडकर चौक.

२०१५ मध्ये नवे ९ सिग्नल१९९४-९५ नंतर शहरात २०१५ मध्ये ९ नवे सिग्नल बसवण्यात आले. यात चंपा चौक, रोपळेकर रुग्णालय, शहानूर मिया दर्गा चौक, बी. एस. एन. एल. चौक, जवाहरनगर पोलिस ठाणे चौक, सेव्हनहिल उड्डाणपूल, सिटी क्लब, कोकणवाडी, चिश्तिचा चौकाचा समावेश करण्यात आला.

केवळ २ स्मार्ट सिग्नलशहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळंबलेली असताना स्मार्ट सिटीकडून केवळ ओखार्ड चौक व मिलिंद चौकात अद्ययावत प्रणालीचे सिग्नल बसवण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. अन्यत्र दुरुस्ती देखील नीट केली गेली नाही.

साधे टाईमरही नाही-४० सिग्नलपैकी २१ सिग्नलमध्ये टाइमर बंद आहे.-८ सिग्नलमध्ये टाइमर प्रणालीच नाही.-३८ सिग्नलमध्ये साधा फ्रि लेफ्ट टर्न लॅम्प नाही.

वाहनांची संख्या अचंबित करणारी-२०१९ मध्ये १३ लाख ६८ हजार वाहने. -२०२३-२४ मध्ये ८२ हजार ७२७ वाहनांची भर.-मे, २०२४ पर्यंत १६ लाख ७० हजार वाहनांची नोंद.-महिन्याला सरासरी सात हजार वाहनांची भर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी