शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पुन्हा शाळा बंद झाल्या तर ? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत वाढती धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:04 IST

शहरात १५ दिवसांत शाळा बंद झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढणार कसे ?

औरंगाबाद : शहरात अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेले वर्ग पुन्हा बंद झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. ऑनलाईनमुळे अध्ययनस्तर ३० टक्क्यांपेक्षा खाली आल्याने शाळा पुन्हा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून काढणार, अशी चिंता शिक्षकांना सतावत आहे.

ग्रामीण भागातील एकूण १२८ केंद्रांमध्ये पाचवी ते सातवीचे वर्ग ५ सप्टेंबरपासून सुरू झाले. कोरोनामुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे जुलैपासून सुरू झालेले आहेत. आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागात ९०७ शाळा असून ६३६ शाळांचे प्रत्यक्ष वर्ग ऑगस्टपासून सुरू आहेत. पहिली ते चाैथीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू झाले. महिनाभरापासून ग्रामीण भागात पहिली ते बारावीचे वर्ग सुरू असून उपस्थिती ७०-७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली. तब्बल दीड वर्षांनंतर जिल्ह्यातील ४,६०२ शाळांतील पहिली ते बारावीच्या वर्गांचे प्रत्यक्ष शिक्षण रुळावर येत असताना शहरातील रुग्णवाढीने खबरदारी म्हणून पहिली ते आठवीचे वर्ग अवघ्या १५ दिवसांत बंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासकांनी घेतला.

खांडी पिंपळगाव शाळेचे शिक्षक कैलास गायकवाड म्हणाले, दीड वर्षानंतर सुरू झालेल्या शाळांत आता कुठे विद्यार्थी उपस्थिती वाढायला सुरुवात झाली आहे. उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून शाळा सुरू राहाव्यात. ग्रामीण भागातील शाळा पुन्हा बंद होतात की काय, या चिंतेने विद्यार्थी, पालक धास्तावले असल्याचे शिक्षक योगेश पाटील म्हणाले.

जिल्ह्यातील शाळातील विद्यार्थी उपस्थितीवर्ग - शाळा -पटसंख्याग्रामीण पहिली ते चौथी - २९२९ -२,२९,५७८शहर पहिली ते सातवी -७४६ -२,००,९९७ग्रामीण पाचवी ते बारावी -७०० -२,५०,४५१शहर आठवी ते बारावी -२२७ -४७,६००

ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील. शाळा, शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक सूचनांच्या काटेकोर अंमलबजावणीवर लक्ष द्यावे.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, जि. प., औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद