शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

पाणीपुरवठा अचानक बंद झाल्यास काय? जलसंपदा विभागाचे तब्बल ४० कोटी रुपये थकले

By मुजीब देवणीकर | Updated: April 25, 2024 15:28 IST

जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे १५ कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी केली, असे मनपातील सूत्रांचे म्हणणे आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून १३० ते १३५ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो. या पाण्याचे बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावे लागते. मागील काही वर्षांपासून मनपाने पैसे भरले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात जलसंपदा विभागाने ४० कोटींची थकबाकी भरावी म्हणून नोटीसही दिली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विभागाकडून कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने काही तास पाणीपुरवठा थांबविला होता.

जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे १५ कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी केली, असे मनपातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरवर्षी काही ठरावीक रक्कम मनपाकडून भरण्यात येते. व्याज आणि दंड मनपा भरू शकत नाही. जलसंपदा विभाग मूळ रक्कम आणि थकबाकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी करीत आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी महापालिकेने करार केला आहे. करारात दरवर्षी किती रक्कम द्यावी, हेसुद्धा नमूद आहे. दर सहा वर्षांनंतर सुधारित करार करावा लागतो. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये मनपाने जलसंपदा विभागाला ८ कोटींपेक्षा अधिक रक्कम अदा केली आहे.

३१ मार्चपूर्वी थकबाकी भरावी, असा आग्रह जलसंपदा विभागाने धरला होता. फेब्रुवारी महिन्यातच मनपाला नोटीसही बजावण्यात आली होती. मनपाकडून थकबाकी भरण्यात आलेली नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून कधीही कारवाईचा बडगा उगारण्यात येऊ शकतो. यापूर्वी जलसंपदा विभागाने मनपाला नोटीस देऊन दररोज काही तास पाण्याचा उपसाही बंद केला होता. ही नामुष्की टाळण्यासाठी मनपाने काही पैसे भरून कारवाई टाळली होती. आता पुन्हा जलसंपदा विभागाकडून अचानक अशा पद्धतीची कारवाई झाल्यास शहराचा पाणीपुरठा बंद होऊ शकतो. अगोदरच शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी