शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

त्रुट्यांचा खेळ थांबणार कधी; ‘समाजकल्याण’कडून बृहत आराखडा जिल्हा परिषदेकडे परत

By विजय सरवदे | Updated: February 7, 2024 11:20 IST

छत्रपती संभाजीनगरात आठ महिन्यांपासून बृहत आराखड्याचे भिजत घोंगडे

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठ महिन्यांपासून ‘अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास’ या योजनेचा बृहत आराखडा अंतिम व्हायचे नाव घेत नाही. आता निवडणूक आचार संहिता कधीही लागू शकते. त्यामुळे या योजनेसाठी तरतूद असलेल्या ३० कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात खर्च होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. चार दिवसांपूर्वीच समाजकल्याण प्रादेशिक कार्यालयाने या आराखड्यात त्रुटी काढून दुरुस्तीसाठी तो परत जि.प. समाजकल्याण विभागाकडे पाठविला आहे.

जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील २ हजार अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये कोणत्या विकासकामांना प्राधान्य देणार, यापूर्वी कोणत्या कामांवर निधी खर्च झाला, किती नवीन वस्त्यांची वाढ झाली आणि या वस्त्यांमध्ये किती लोकसंख्या वाढली, आगामी पाच वर्षांत कोणती विकासकामे राबवावी लागतील, यासंबंधीचा आराखडा तयार करुन तो साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात पंचायत समित्यांकडे सादर केला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी तो तपासून त्रुटी दुरुस्तीसाठी परत ग्रामपंचायतींकडे पाठविला. त्यानंतर परिपूर्ण बृहत आराखडा गटविकास अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात जि.प. समाजकल्याण विभागाकडे सादर केला होता. मागील २० दिवसांपूर्वी जि.प.ने या आराखड्यास अंतिम मान्यता घेण्यासाठी तो समाजकल्याण प्रादेशिक कार्यालयाकडे सादर केला होता. तिथे या आराखड्याची बारकाईने तपासणी करण्यात आल्यानंतर चार दिवसांपूर्वीच तो त्रुट्यांच्या दुरुस्तीसाठी परत जि.प.कडे पाठविण्यात आला.

यासंदर्भात जि.प. समाजकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशी सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागेवरच काही किरकोळ दुरुस्त्या केल्या. पण, महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी काही बृहत आराखडे ग्रामपंचायतींकडे पाठविले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. त्रुट्यांच्या दुरुस्तीसाठी आणखी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात आचार संहिता कधीही लागू शकते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात अर्थात या दीड महिन्यात योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिकारी चिंतेत आहेत.

शनिवारी दिवसभर चालली बैठकशनिवारी जि.प.मध्ये झालेल्या बैठकीत पंचायत समित्यांचे काही गटविकास अधिकारी तर काही नोडल अधिकारी उपस्थित होते. त्यांनी काही ग्रामसेवकांकडे मोबाईलवरून विचारणा करत बृहत आराखड्यांमधील त्रुट्या दुरुस्त केल्या, तर अनेक आराखडे दुरुस्तीसाठी संबंधित ग्रामपंचायतींकडे दिले जाणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद