शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

छत्रपती संभाजीनगरमधील कचरा जातोय तरी कुठे? महिनाभरात १ हजार मेट्रिक टन कचरा घटला

By मुजीब देवणीकर | Updated: August 18, 2023 19:38 IST

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा घटल्याची धक्कादायक बाब समोर आली.

छत्रपती संभाजीनगर : मनपा प्रशासनाने १ ऑगस्टपासून ओला-सुका कचरा स्वीकारण्याचे धोरण पत्करले. ज्या भागातून मिक्स कचरा येईल, त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत गेले. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा घटल्याची धक्कादायक बाब समोर आली. नेमका हा कचरा जातोय कुठे याचा शोध महापालिकेकडून सुरू झाला आहे.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला इन्दूरपेक्षाही सुंदर करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्यास सुरूवात झाली. ओला-सुका कचरा वेगळाच करून घेतल्या जातोय. त्यामुळे घंटागाडीतून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण देखील घटल्याचे समोर आले आहे. महिनाभरात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा कमी आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले. ज्या भागात वर्गीकरण न करता कचरा दिला जातो, त्या भागात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कचऱ्यापासून खत कसे तयार होते. सुका कचरा कुठे पाठवला जातो, हे सांगितले जात आहे. कचरा वर्गीकरण आता ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचऱ्याचे प्रमाणही कमी झाल्याचे जाधव यांनी सांगितले. जून महिन्यात १५ हजार १० मे. टन कचरा आला. जुलै महिन्यात १३ हजार ७७५ मेट्रिक टन कचरा आल्याचे त्यांनी नमूद केले.

दुष्परिणाम आता समोर येत आहेतकचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक भागात भीतीपोटी किंवा वर्गीकरण केलेला कचरा रस्त्यावर फेकला जाण्याची भीती आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाया केल्या जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचऱ्यात पूर्वी दगड, माती असू शकते. वजन वाढविण्यासाठी काहीही केले जाऊ शकते. त्यामुळे मूळ कारणांचा शोध घेतोय, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका