शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निधी लाटणाऱ्यांवर गुन्हे का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:24 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी अपहार प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. निधी लाटण्याचे प्रकार आरोग्य विभागात सातत्याने होत आहेत. तरीही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात तक्रार का केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला.

ठळक मुद्देजि.प. सर्वसाधारण सभेत सवाल : जिल्हा आरोग्य अधिकाºयांवर भडीमार

औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी अपहार प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. निधी लाटण्याचे प्रकार आरोग्य विभागात सातत्याने होत आहेत. तरीही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात तक्रार का केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला. दरम्यान, आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून यासंदर्भात मार्गदर्शन प्राप्त होताच येत्या आठ दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.जि. प. सदस्य किशोर पवार, उपाध्यक्ष केशव तायडे पाटील, सुरेश सोनवणे, विजय चव्हाण, मधुकर वालतुरे, एल. जी. गायकवाड, रमेश पवार, अविनाश गलांडे, रमेश गायकवाड या सदस्यांनी आरोग्य विभागात पुरवठादारास ९ लाखांचे ९० लाख देण्यात आले. अलीकडे २ लाख ३० हजार रुपयांचे देणे असताना २३ लाख रुपये हडप केले. या प्रकाराने आणखी किती लाखांचा अपहार आरोग्य विभागाला अपेक्षित आहे. यासंदर्भात मुंबई येथील आरोग्य विभागाच्या पथकाने सविस्तर चौकशी केल्यानंतरही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल का केला नाही. आरोग्य विभाग निधी लाटणाºया कर्मचाºयांना पाठीशी घालत असल्याचा या सदस्यांनी आरोप केला.सदस्यांच्या आरोपाचे खंडण करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सभागृहासमोर स्पष्टीकरण दिले की, ज्या कर्मचाºयांनी ही चूक केली होती, त्या कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ‘एनएचएम’ मध्ये कंत्राटी अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार आरोग्य आयुक्तांना आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आल्याशिवाय पोलिसात गुन्हे दाखल करता येणार नाहीत. तेव्हा उपाध्यक्ष केशव तायडे व किशोर पवार म्हणाले की, जि. प. मध्ये अन्य विभागातील कर्मचाºयांकडून एखादी चूक झाली, तर लगेच त्याविरुद्ध कठोर पावले उचलली जातात, मग आरोग्य विभागात लाखो रुपयांचा घोटाळा केल्यानंतरही त्या कर्मचाºयास केवळ सेवेतून बडतर्फ केले जाते. मग, अपहार केलेल्या रकमेची भरपाई कोण देणार. तेव्हा डॉ. गिते म्हणाले की, ती रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात आली आहे. यावरही सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी दोन दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली.चौकट .....आठ दिवसांत केली जाईल दोषींविरुद्ध पोलीस कारवाईमुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी सभागृहाला सांगितले की, डॉ. गिते यांनी जिल्हा आरोग्य अधिकारीपदाची सूत्रे घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना या घटनेविषयी मुंबईला पाठविण्यात आले. तेथे आरोग्य विभागाच्या आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतर चौकशी पथक जिल्हा परिषदेत पाठविले. अधिकाºयांच्या चौकशी पथकाने आरोग्य विभागात तब्बल १५ ते २० दिवस तळ ठोकून ‘एनएचएम’च्या प्राप्त सर्व निधीची पडताळणी करून ते पथक मुंबईला रवाना झाले. आरोग्य आयुक्तांसोबत चर्चा करून येत्या आठ दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले जातील.------------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा