शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

लोकसभा मतदारसंघ कोणाकडे? छ. संभाजीनगर भाजपमध्ये चलबिचल; ८ वेळा मुंबई, दिल्ली वाऱ्या 

By विकास राऊत | Published: March 19, 2024 12:52 PM

शांततेत दडलंय काय, जागेच्या वाटाघाटीत काय होणार यावर कुणीच काही बोलेना

छत्रपती संभाजीनगर : भाजप आणि शिवसेना शिंदे गटात औरंगाबादलोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही जागा महायुतीच्या वाटाघाटीत भाजपलाच सुटावी, यासाठी भाजप पदाधिकारी, नेत्यांनी ६ मार्चपासून आजवर आठवेळा मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या केल्या. उमेदवारीचे चित्र अजूनही अस्पष्टच असल्यामुळे इच्छुकांसह पक्षाचे नेते, पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेनंतर भाजप ही जागा पहिल्यांदाच लढणार असे चित्र स्पष्ट झालेले असताना शिवसेना शिंदे गटाने दहा दिवसांपासून ही जागा शिंदे गट लढणार असा दावा केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपतील इच्छुक उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. जागेच्या वाटाघाटीत काय होणार यावर पक्षातील पदाधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत, तर शिंदे गटाकडून रोज जागा आमचीच असा दावा करण्यात येत आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या भेटी घेऊन पक्षाने मागील वर्षभरापासून केलेले काम, सामाजिक समीकरणासह इतर बाजू मांडल्या आहेत. शिंदे गटाला जागा सुटल्यास भाजपच्या संघटन बांधणीवर मोठा परिणाम होईल. शिंदे गटाने मतदारसंघ बांधणीसाठी प्रयत्न केलेले नाहीत. भाजपच्या नेटवर्कवरच त्यांची भिस्त आहे, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. जागा न सुटल्यास नाराज झालेली भाजपची फळी शिंदे गटाचे किती ताकदीने काम करील याबाबत पदाधिकारी खासगीत बोलताना शंका व्यक्त करीत आहेत. औरंगाबादलोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. भाजपचे दोन आमदार आहेत. शिंदे गटाचा एकही मंत्री मतदारसंघात नाही, तर भाजपकडे एक केंद्रीय राज्यमंत्री आणि एक राज्यात असे दोन मंत्री आहेत. भाजप किमान वर्षभरापासून मतदारसंघात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहे, तर शिंदे गटाकडूनही असाच दावा करण्यात येत आहे.

भाजपकडून प्रतिक्रिया नाहीजागा मागणीवरून शिंदे गटाच्या आक्रमकतेपुढे भाजपकडून कुणीही प्रतिक्रिया देत नाही. भाजप एवढी शांत का आहे, त्यांच्या शांततेत नेमके काय दडले आहे, हे कळण्यास मार्ग नाही. एकतर जागा सुटणार असा त्याचा अर्थ आहे किंवा जागा शिंदे गटाला जाणार असा दुसरा अर्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चर्चेचे गुऱ्हाळ लांबणारलोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी अधिसूचना गुरुवार, दि. १८ एप्रिल रोजी निघणार आहे. आजपासून एक महिन्याने अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे या जागेचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत लांबतो की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या आठवड्यात तिढा सुटला तर सुटेल, वाटाघाटीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ एप्रिल उजाडेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा