शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ? विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच ‘सुसाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 17:24 IST

नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचा आता संयम सुटत आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादहून आजघडीला सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. या रेल्वेत जनरल तिकीट बंद आहे. आरक्षित तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व व्यवहार अनलाॅक झाले आहेत. मात्र, अद्यापही पॅसेंजर रेल्वे लाॅक आहेत. गेल्या १७ महिन्यांपासून विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच धावत आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचा आता संयम सुटत आहे. एक्स्प्रेस, एसटी, दुचाकीने रोज ये-जा करणे, हे आर्थिकदृष्ट्या परवड नसल्याने पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर रेल्वे आवश्यक आहेत. औरंगाबादहून आजघडीला सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. या रेल्वेत जनरल तिकीट बंद आहे. आरक्षित तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. आरक्षण तिकिटासाठी अधिक रक्कम मोजण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड-रोटेगाव डेमू आणि रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वे सुरू करण्यात आली. त्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु या रेल्वेची वेळ गैरसोयीची ठरत आहे. ही वेळ बदलण्यासह सर्व पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.

बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वेऔरंगाबादमार्गे धावणाऱ्या निजामाबाद-पुणे पॅसेंजर, नांदेड-दौंड पॅसेंजर, काचीगुडा-नगरसोल पॅसेंजर, जालना-नगरसोल डेमू पॅसेंजर बंद आहे.

सुरू असलेल्या एक्स्प्रेससध्या सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, अजंता एक्स्प्रेस, रेणीगुंठा एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस धावत आहेत.

बंद असलेली एक्स्प्रेसऔरंगाबादमार्गे धावणारी चेन्नई एक्स्प्रेस सध्या बंद आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यातून धावणारी, दक्षिण भारताशी कनेक्टिव्हिटी देणारी ही रेल्वे सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी केली.

मागणी असेल तेथे वाढविल्या जातीलप्रत्येक सेक्शनमध्ये एक पॅसेंजर चालेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मागणी असेल तेथे पॅसेंजर वाढविल्या जातील. मात्र, कोविडची परिस्थिती आणि गाईडलाईनवरून यासंदर्भात निर्णय घेतले जातील.- उपिंदर सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड, दमरे

विद्यार्थ्यांची गैरसोयपॅसेंजर रेल्वे बंद असल्याने औरंगाबादला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळच्या वेळेत औरंगाबादेत पोहोचण्यासाठी पूर्वीच्या पॅसेंजर लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजे.-प्रीती जैस्वाल, प्रवासी

पॅसेंजर सुरू कराएसटीने विशेष रेल्वेने ये-जा करणे परवडणारे नाही. दुचाकीने प्रवास करताना वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका असतो. त्यामुळे रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर पुन्हा सुरू कराव्यात.- अक्षय वायकोस, प्रवासी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे