शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आभाळ कोसळलं तरी ई-पीक पाहणी का नाही? अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:15 IST

नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली.

छत्रपती संभाजीनगर : ई-पीक पाहणी करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. मात्र शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिकांचा ई-पीक पेरा नोंद करण्याबाबत शासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. मुदतवाढही देण्यात आली. मात्र, जिल्ह्याच्या ई-पीक पाहणी पेऱ्याचे प्रमाण केवळ ५६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले.

अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरानोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली. यामुळे आता सातबाऱ्यावर पिकाची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे चकरा माराव्या लागतील.

४ वर्षांपासून ई-पीक पाहणी बंधनकारकचार वर्षांपासून राज्यात ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन आणण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पिकाचे छायाचित्र घेऊन ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करावे लागते. यासोबत पीक पेऱ्याची नोंद करणे बंधनकारक आहे. नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे अनुदान, विमा मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

कोणत्या तालुक्यात किती ई-पीक पाहणी ? (तक्ता)तालुका ----टक्केवारी

कन्नड - ५१.३९खुलताबाद-- ५४.२१गंगापूर--- - ५५.६३छत्रपती संभाजीनगर - ४५.६४पैठण-- ५६.४४फुलंब्री--- ५०.३८वैजापूर--- ६४सिल्लोड-- ५६.८८सोयगाव-- ७१.६५

सोयगाव एक नंबर; छत्रपती संभाजीनगर सर्वात मागेई-पीक पाहणी नोंदणी करण्यात जिल्ह्यात सोयगाव तालुका प्रथम स्थानी आहे. ७१.६५ टक्के पीक पाहणी झाली. छत्रपती संभाजीनगर तालुका सर्वात मागे आहे. केवळ ४५.६४ टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली.

अनेकांकडे फोनच नाही; इंटरनेटही ‘स्लो’ॲड्राॅइड मोबाइल असणारे शेतकरी स्वत: ई-पीक पेरा नोंद करू शकतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे असे मोबाइल नाहीत, त्यांना इतरांच्या मोबाइलवरून नोंद करता येते. परंतु बऱ्याचदा हे ॲप्लिकेशन ‘हँग’ होते. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधांचा अभावही यास कारणीभूत आहे.

४४ टक्के शेतकऱ्यांचे काय होणार?ई-पीक पाहणी करू न शकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४४ टक्के असल्याचे महसूल विभागाकडून प्राप्त माहितीवरून दिसते. आता या शेतकऱ्यांचे काय होणार, असा प्रश्न आहे.

ई-पीक पाहणी ही महसूल विभागाच्या वतीने करण्यात येते. शेतकऱ्यांना ॲप्लिकेशनवर ही नोंदणी करावी लागते. नैसर्गिक संकटात पिकाचे नुकसान झाल्यास ही नोंद उपयोगी पडते. अन्यथा अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याचा प्रसंग येऊ शकतो. यामुळे दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पाहणी मुदतीत करावी.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर