शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

का होतेय असे? हल्ली १४ वर्षांची मुलेही म्हणतात, मला जगायचे नाही

By संतोष हिरेमठ | Published: September 10, 2024 5:27 PM

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: वेळीच लक्ष द्या, आत्महत्या रोखणे हे शक्य

छत्रपती संभाजीनगर : मला कमी गुण मिळाले, घरात मला कोणीच मान देत नाही, मला मोबाइल दिला जात नाही, म्हणून स्वत:ला संपविण्याचे हे कारण असू शकते का? आत्महत्येची कारणे शोधली तर अशाच घटना समोर येतात. हल्ली १४ वर्षांची मुलेही म्हणतात, मला जगायचे नाही. तरुण-तरुणींमध्ये व्यसनाधीनता, झटपट यश मिळण्याची अपेक्षा, आदी कारणांनी आत्महत्या होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसाद देशपांडे म्हणाले, विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये आत्महत्येचे विचार बघायला मिळतात. नैराश्य अधिक प्रमाणात असते. बायपोलार मूड इलनेस, स्किझोफ्रेनिया आजारांची लक्षणे काही रुग्णांमध्ये आढळतात. मादक पदार्थांचे सेवन आणि आत्महत्या प्रवृत्ती एकत्र बघायला मिळते. डाॅ. प्रदीप देशमुख म्हणाले, ‘एनसीआरबी’ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

जिल्ह्यात ५२८ जणांची आत्महत्याग्रामीण भागात २०२३ मध्ये ५२८ जणांनी आत्महत्या केली. यात १४ ते १८ वर्षे वयोगटातील ११ जणांनी, तर १४ वर्षे वयोगटातील तिघांनी आत्महत्या केली.

अपयशातून पुढे जाणे शिकवामुलांना अपयशातून पुढे कसे जावे, हे पालकांनी शिकविले पाहिजे. मुलांची क्षमता ओळखून त्यांच्याकडून अपेक्षा केल्या पाहिजे. आत्महत्येचा प्रयत्न करणारे अगदी १० वर्षांच्या मुलांपासून तरुण, ज्येष्ठ रुग्ण उपचारासाठी येतात.- डॉ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ

ही तर इमर्जन्सीआत्महत्येचे विचार येणे, तसा प्रयत्न करणे या गोष्टी मानसोपचारशास्त्रामध्ये इमर्जन्सी मानली जाते. अति नैराश्य तसेच सायकोसिस या आजारात आत्महत्या प्रामुख्याने आढळून येतात.- डाॅ. आनंद काळे, मनोविकारतज्ज्ञ

ही चिंतेची बाबहल्ली १३ ते १४ वर्षांचे मूलही सहज आत्महत्याविषयी बोलून जाते. मला जगायचे नाही. मरावे वाटते, असे ते म्हणते. तिशीच्या आतील आत्महत्येचा विचार येणारी किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ही चिंतेची बाब आहे- डाॅ. संदीप सिसोदे, समुपदेशक

...तर गांभीर्याने घ्यावेनैराश्य आणि मानसिक विकार ही कारणे हे जवळपास ७० टक्के आत्महत्या करणाऱ्यांमागे असतात. कोणी व्यक्ती जर आत्महत्येबाबत बोलत असेल तर ते गांभीर्याने घ्यावे. त्या व्यक्तीच्या संपर्कात राहावे.- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ

सात महिन्यांत ८३ शेतकऱ्यांची आत्महत्याछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी ते जुलैदरम्यान एकूण ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आजपर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले.- डाॅ. जितेंद्र डोंगरे, सहायक संचालक तथा मनोविकृतीशास्त्रज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी