शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

आव्हाने विराट असताना प्रतिसाद का नाही? : अभय बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:49 IST

केळकर समितीचा अहवाल लागू करा 

ठळक मुद्देसहा वर्षांपासून हा अहवाल थंडबस्त्यात आहे.

औरंगाबाद : आज संपूर्ण जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जातीयता, सांप्रदायिकता यासारखी विराट आव्हाने आ वासून उभी असताना त्याला प्रतिसाद का मिळत नाही, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक सभ्यता लोप पावत आहेत, महात्मा नाही तर नायक, वैश्विकदृष्टी असलेले  नवे नेतृत्व का उभे राहत नाही, राजकीय आंदोलने का उभी राहत नाहीत, असे अनेक मूलभूत प्रश्न आज येथे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केले.

ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात न्या. नरेंद्र चपळगावकरलिखित ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या ग्रंथ प्रकाशनाप्रसंगी बोलत होते. अनंत भालेराव यांच्यावरील या ग्रंथातून प्रतिसादाची आणि नवे नायक निर्माण होण्याची प्रेरणा मिळो, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.लेखकीय मनोगत व्यक्त करताना न्या. चळगावकर हे भावुक झाले. अनंतरावांच्या अनेक आठवणींमध्ये ते रममाण झाले. प्रारंभी, अभंग प्रकाशनचे संजीव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक  केले. विश्वाधार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सविता पानट यांनी आभार मानले. निशिकांत भालेराव, श्याम देशपांडे, नीमा कुलकर्णी आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. शंभर कोरे कागद व पेन, असे या स्वागताचे स्वरूप होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पं. विद्यासागर, विजय कुवळेकर, सुरेश द्वादशीवार व दिलीप माजगावकर यांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते. यावेळी निळू दामले, गोपाळ साक्रीकर, राधाकृष्ण मुळी, भास्कर ढवळे, गोविंद जोशी यांचा सत्कार करण्यात आला. चपळगावकर पती-पत्नीचा विशेष सत्कार डॉ. बंग यांच्या हस्ते करण्यात आला. अनंत भालेराव यांच्या चाहत्यांची या कार्यक्रमास मोठी गर्दी उसळली होती.

केळकर समितीचा अहवाल लागू करा स्वप्नांचा अभाव हे एक मोठे आव्हान हल्ली निर्माण झालेय. मराठवाडा तर कायम पाणीटंचाई, कायम दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे ग्रासला गेलेला आहे. केळकर समितीने मराठवाड्यासाठी सव्वादोन कोटी लाख रुपयांच्या तरतुदींची शिफारस केलेली आहे.या समितीचा एक सदस्य म्हणून मी काम केलेले आहे.सहा वर्षांपासून हा अहवाल थंडबस्त्यात आहे. त्यावर ना मराठवाड्यातून आवाज उठतो, ना विदर्भातून? हा अहवाल नाकारला, तर काय गमावू याचा कुणी विचार केलाय का? या अहवालातून मराठवाडा व विदर्भ ही उपराज्ये सुचवलेली आहेत; पण त्याबद्दल कुणी काहीच बोलत नाही, याबद्दलची खंत बंग यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Abhay Bangअभय बंगSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद