शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

कशाला औरंगाबादेत जन्म घेतला...!

By admin | Published: August 06, 2016 12:10 AM

मुजीब देवणीकर, औरंगाबाद मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत.

मुजीब देवणीकर, औरंगाबादशहरातील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयात सकाळ, संध्याकाळ चकरा मारून जाम वैतागलेल्या नागरिकांचा संताप ‘कशाला औरंगाबादेत जन्म घेतला’ अशा शब्दांत उफाळून येत आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला स्वत:च्या जन्म प्रमाणपत्राची फक्त साक्षांकित प्रत मिळविण्यासाठी चक्क दोन महिन्यांपासून वॉर्ड कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतीच सुटसुटीत पद्धत नाही. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात प्रमाणपत्र देण्यासाठी संगणकावर चक्कचौथी किंवा पाचवी उत्तीर्ण असलेल्या सफाई मजुरांना बसविण्यात आले आहे. त्यांना इंग्रजी तर सोडा व्यवस्थित मराठीही लिहिता, वाचता येत नाही. सहा वॉर्ड कार्यालयांमधून दररोज १०० ते १२५ जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येतात. यामध्ये ८० टक्के प्रमाणपत्रांमध्ये चुकाच चुका असतात. एकदा देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्या नागरिकांनी वॉर्ड कार्यालयातील ‘दलाल’ अथवा कर्मचाऱ्यांच्या हातात ठराविक रक्कम ठेवली तर दुसऱ्या तासाला पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रताप मागील अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहेत.महापालिका मुख्यालयातील वॉर्ड ‘अ’कार्यालयात तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान शंभर ते दीडशे नागरिक एका खोलीसमोर उभे असतात. ‘लोकमत’प्रतिनिधीने नागरिकांची विचारपूस केली असता जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ही झुंबड असल्याचे सांगितले. अनेक नागरिकांनी मागील पाच ते सहा महिन्यांपासून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चकरा मारत असल्याचे नमूद केले. मनपाने ज्या चुका केल्या आहेत, त्या दुरुस्त करून देण्यासाठी मनपाच नकार देत असल्याचे काहींनी नमूद केले. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभाग सांभाळणारे लिपिक जमील हे स्वत:ला मनपा आयुक्तच समजतात. एकाही नागरिकांशी त्यांचे व्यवस्थित बोलणे नाही. प्रत्येक नागरिकाच्या अर्जात कारकुनी खोड्या काढण्यात ते अत्यंत पटाईत आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे प्रमाणपत्र येथे काढण्यात येते. सर्वाधिक बालक घाटीत जन्माला येतात. त्यामुळे येथे जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अलोट गर्दी असते. रुग्णालयाकडून आलेले रेकॉर्ड मनपाने आपल्या रजिस्टरमध्ये नोंद ठेवणे आवश्यक असते. मागील अनेक वर्षांपासून वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डच तयार केलेले नाही. रुग्णालयांकडून आलेल्या माहितीवरूनच जन्म प्रमाणपत्र बनविण्यात येते. यातील जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचे काही रेकॉर्डच गायब असल्याची धक्कादायक माहिती काही नागरिकांनी दिली. त्यामुळे मनपा कर्मचारी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. जमील या कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून प्रशासनाने त्यास निलंबित करावे, अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली.