शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:49 IST

पाणवठे कोरडेठाक; डोंगरही बोडखे : उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाची दमछाक

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यासह अजिंठ्याच्या डोंगरात पाण्याअभावी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. उन्हामुळे डोंगर बोडखे झाले असून चोहीकडे पाण्याचा ठणठणाट आहे. वन्यप्राण्यांना थांबण्यासाठी सावली नाही. डोंगरात पिण्यासाठी पाणी नाही. उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाच्या नाकात दम आला आहे.मागील आठवड्यात शिरसाळा तांडा परिसरात एका बिबट्याचा अन्न -पाण्याविना तडफडून मृत्यू झाला होता. यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. पाण्यासाठी वन्यप्राणी रस्त्यावर, गाव वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकून वन विभाग वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे, पण याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला नाही तर वन्यप्राण्यांची संख्या घटल्यास आश्चर्य वाटू नये.अजिंठा डोंगरात बिबट्या, अस्वल, हरण, मोर, लांडगा, नीलगाय, तडस, पशू पक्षी, सरपटणारे प्राणी आहेत. सिल्लोड, अजिंठा, सोयगाव वन परिक्षेत्रातील सर्वच जंगलात उन्हामुळे पानगळ झाली आहे. याचा फटका वन्यप्राण्यांना बसला आहे.सिल्लोड वन परिक्षेत्रात १ हजार ५९ हेक्टर, अजिंठा वनपरिक्षेत्रात ९ हजार हेक्टर, सोयगाव ९ हजार हेक्टर असे एकूण १९ हजार हेक्टर परिक्षेत्र आहे. त्यातील सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले आहे. मानवी वस्त्यांकडे आलेल्या अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हरणांचे लचके तोडले आहे. नीलगाय, हरण विहिरीत पडत आहे.३४ कृत्रिम पाणवठ्यात टँकरचे पाणीवन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये, यासाठी वन विभागाने सिल्लोड परिक्षेत्रात पिंपळगाव घाट, चिंचवण, शिंदेफळ, धावडा, पळशी परिसरात ५ पाणवठे तयार केले आहेत. अजिंठा वन विभागाने अजिंठा, नाटवी, जळकी, वसई, जामठी, हिंगणा, फर्दापूर, ठाणा, देव्हारीच्या जंगलात २० कृत्रिम पाणवठे तर सोयगाव तालुक्यात ९ पाणवठे तयार केले आहेत. त्यात आता टँकरद्वारे पाणी टाकून वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वन विभाग करताना दिसत आहे. अजिंठा, सिल्लोड, सोयगाव परिक्षेत्रात एकूण ३४ कृत्रिम पाणवठे तयार केले असून यात टँकरने नियमित पाणी टाकले जात आहे. यामुळे प्राण्यांची तहान काही अंशी भागत आहे, अशी माहिती अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे, सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. दहिवाल, सोयगावचे शिवाजी काळे यांनी दिली. यासाठी दरमहा १ लाख ६३ हजार रुपये पाण्यावर खर्च होत आहे.४ लाख १४ हजार रोपे जगविलीअजिंठ्यात भीषण पाणीटंचाई असताना नर्सरीसाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन अजिंठा मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा करून अजिंठा वन विभागाने ४ लाख १४ हजार रोपे जगविली. यामुळे आज ही रोपवाटिका हिरवीगार दिसत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे यांनी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभागwater shortageपाणीकपात