शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

नांदेड पॅटर्ननुसार बारावीची परीक्षा होईल का काॅपीमुक्त ?

By योगेश पायघन | Updated: February 21, 2023 14:21 IST

संवेदनशिल केंद्रावर ३ जणांचे तर प्रत्येक केंद्रावर दोघांचे बैठे पथक

औरंगाबाद : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे सुरूच होते. वारंवार मुदतवाढ देवूनही विलंबाने तब्बल ४ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याने विभागीय मंडळाला कसरत करावी लागली. तर भयमुक्त आणि काॅपीमुक्त परीक्षेसाठी विभागात तब्बल ४९ भरारी पथकांची विभागात स्थापना करण्यात आली आहे. तसेच महसुल यंत्रणेचे तालुकानिहाय १ भरारी आणि केंद्रनिहाय २ जणांचे बैठे पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहीती विभागीय सचिव विजय जोशी यांनी दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाची लेखी परीक्षा नांदेडचा कॉपीमुक्त पॅटर्न नुसार घेण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे भरारी पथकासह, बैठे पथक आणि अन्य विविध विभागांच्या दहा पथकांचे नियोजन विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विभागात ४३० केंद्रांवर १ लाख ६९ हजार ९८० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तणामुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी वातावरण निर्मीतीसाठी परीक्षा केंद्र संचालकांच्या बैठका घेण्यात आल्या. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील केंद्र संचालकांच्या बैठक पार पडली. परीक्षा केंद्रात ५० मिटरमध्ये परीक्षेशी संबंधीत कुणालाही प्रवेश देवू नये. परीक्षेतील गैरप्रकार केल्यावर उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरील सुचना परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना वाचुन दाखवण्यासह गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रतिबंध उपयायोजना केल्या आहेत. अशी माहीती विभागीय मंडळाचे सचिव विजय जोशी दिली.

संवेदनशिल ४८ केंद्रावर स्वतंत्र पथकसंस्थाचालक, मुख्याध्यापक, केंद्र संचालकांना काॅपीमुक्त आणि निकोप वातावरणात परीक्षेसाठी सुचना दिल्या आहेत. महसुल विभाग, शिक्षण विभागाची भरारी व बैठे पथके परीक्षेवर नजर ठेवून असतील. तसेच संवेेदनशिल ४८ केंद्रावर ३ जणांचे बैठे पथक तसेच इतर केंद्रावर प्रत्येकी २ जणांचे बैठे पथक महसुल विभागाने नेमले आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. गैरप्रकार होणार नाही. यासाठी संस्था, शाळा, केंद्र संचालकांनी लक्ष द्यावे.-एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद

असे आहेत भरारी पथकेविभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक, माध्यमिक, योजना शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, विद्या प्राधिकरण, डाएट, महिलांचे स्वतंत्र पथक असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर २ जणांचे बैठे पथक परीक्षेच्या आधी एक तास ते परीक्षेनंंतर एक तास उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

अशी आहे आकडेवारीजिल्हा -कॉलेज- परीक्षा केंद्र - परीक्षार्थीऔरंगाबाद ---४७०---१५७ --६०,९२६बीड ---२९८ ---१०१ -३९,१८५परभणी ---२३३---५९ ---२४,७०५जालना --- २३९ --८० ---३१,५००हिंगोली ---१२०--- ३३ ----१३,४८५एकूण -१,३६० ---४३०---१,६९,८०१

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाEducationशिक्षण