शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

छत्रपती संभाजीनगरवासीयांचे कंबरडे मोडणार; दररोज पाणी हवे तर भरा तीनपट मालमत्ता कर!

By मुजीब देवणीकर | Published: August 29, 2024 4:37 PM

नवीन पाणीपुरवठा योजनेत ८२२ कोटींच्या कर्जाचे ‘नाट्य’; कर्जाची परतफेड करण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा पर्याय शासनाने दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराला दररोज मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत मनपाला ८२२ कोटी रुपयांचा वाटा कर्ज काढून टाकावे लागणार आहे. कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाने निव्वळ हमी घेतली. कर्जाची परतफेड करण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा पर्याय शासनाने दिला आहे. ६०० चौरस फुटाच्या घराला ४ हजार रुपये वार्षिक कर असेल तर रेडीरेकनर दराने तीनपट वाढ म्हणजे १२ हजार रुपये सुधारित कर होईल, त्यामुळे शहरवासीयांचे कंबरडे मोडणार हे निश्चित.

८२२ कोटी रुपयांचे घेण्यासाठी शासनाने चार दिवसांपूर्वीच हमी घेतली. यामध्ये एकूण दहा अटी-शर्थी टाकल्या. महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी किंवा खुल्या बाजारातून एलआयसी, हुडको यांच्याकडून कर्ज घेण्याचा पर्याय दिला. ८२२ कोटींचे कर्ज किमान ४ टक्के दराने मिळेल. १० वर्षांची परतफेडही बंधनकारक शासनाने केली. या रकमेवर निव्वळ व्याजच ६२२ कोटी रुपये होणार आहे. दरमहा महापालिकेला १२ कोटी रुपयांचा हप्ता भरावा लागेल. सुरुवातीचे चार वर्षे तर व्याजाची रक्कम भरण्यातच जातील. मनपाला ८२२ कोटींची गरज असताना कर्ज ७५ टक्केच उपलब्ध होईल. उर्वरित रक्कम तिजोरीतून मनपाला टाकावी लागेल. महापालिकेने कर्जाची परतफेड न केल्यास जीएसटीसह अन्य अनुदानातून शासन रक्कम कपात केली जाईल, असा गर्भीत इशाराही शासनाने दिला आहे.

१ एप्रिल २०२५ पासून सुधारित करशासनाने कर्जाची हमी घेताना मनपाला टाकलेल्या जाचक अटींमध्ये मालमत्ता करात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. १ एप्रिल २०२५ पासून मालमत्ताधारकांना भांडवली मूल्याधारित (कॅपिटल बेस) कर आकारावा. म्हणजेच शासनाच्या रेडीरेकनर दरानुसार मालमत्ता कर ठरेल. सध्या ज्यांना ४ हजार रुपये कर आकारल्या जातो त्यांना थेट तीनपट वाढ करून १२ हजार रुपये आकारणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

सूक्ष्म अभ्यास सुरूमनपाला दरमहा अत्यावश्यक खर्च ४५ कोटी आहे. जीएसटी अनुदान २९ कोटी येते. उर्वरित खर्च मनपातून केला जातो. त्यात १२ कोटींच्या हप्त्याची भर पडेल. शासन आदेशानुसार अत्यंत बारकाईने अभ्यास करून प्रशासक यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय होतील.संतोष वाहुळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

मनपाने मागितले काय?८२२ कोटी रुपयांचा वाटा भरण्यासाठी महापालिकेने मागील वर्षीच राज्य शासनाला अनुदान मागितले. आर्थिकदृष्ट्या एवढी मोठी रक्कम मनपाला भरणे शक्य नाही. विशेष बाब म्हणून मनपाला अनुदान द्यावे, अशी वारंवार विनंती केली.

महापालिकेला काय मिळाले?शासनाकडून अनुदान तर सोडाच निव्वळ कर्जाच्या रक्कमेची हमी घेण्यात आली. त्यात अत्यंत जाचक अटी-शर्थी टाकण्यात आल्या. मालमत्ता करात वाढ करण्याची सूचना दिली. कर्ज न भरल्यास अनुदान बंद करण्याचा इशाराही दिला.

काय तर आम्ही पैसे दिले...भाजपाने दोन वर्षांपूर्वी मनपावर हंडा मोर्चा काढला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेता यांनी ८२२ कोटी रुपये शासन देईल, असे आश्वासन दिले. सध्या महायुतीचे नेते आम्ही मनपाला पैसे दिले, अशी घोषणा करीत आहेत. कर्जासाठी हमी घेतली हे कोणी सांगायला तयार नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीTaxकर