शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मराठ्यांचे ईव्हीएम हटाव आंदोलन प्रभावी ठरेल काय?

By स. सो. खंडाळकर | Updated: March 11, 2024 15:25 IST

एका ईव्हीएम मशीनवर जास्तीत जास्त १६ उमेदवारांची नावे, चिन्हे देता येऊ शकतात. म्हणजे ३६४ उमेदवारांचीच नावे त्यावर घेता येतात.

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य होत नसल्याने सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती मराठा आंदोलकांनी आखली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान ५ व एका मतदारसंघातून ४ ते ५ हजार उमेदवार उभे करण्याचे त्यांनी ठरवले आहे. तशी तयारी गावागावांत सुरू झाली आहे. विशेषत: मराठवाड्यात या चळवळीला वेग आला आहे. असे झाले तर निवडणूक आयोगाला ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागेल.

एका ईव्हीएम मशीनवर जास्तीत जास्त १६ उमेदवारांची नावे, चिन्हे देता येऊ शकतात. म्हणजे ३६४ उमेदवारांचीच नावे त्यावर घेता येतात. त्यापेक्षा जास्त म्हणजे ३६५ किंवा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असतील तर मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागते, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. ईव्हीएमची हीच अडचण ओळखून मराठा आंदोलकांनी एकेका मतदारसंघात २ ते ४ हजार उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. जेणेकरून प्रशासनाला मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागेल. एखाद्या मतदारसंघात ते शक्य आहे; पण ४८ मतदारसंघांत हीच परिस्थिती निर्माण झाली तर त्यांची दमछाक होईल. मराठा आंदोलकांची ही खेळी यशस्वी होईल काय, यावर घडवून आणलेली ही चर्चा...

सरकार मार्ग काढेल, असं वाटतं...मराठा आरक्षण ओबीसीतून देता आलं असतं तर मागेच दिलं असतं. ते देता येत नाही म्हणून आता राज्य सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे. आता त्यातून मराठा समाज नोकऱ्याही घेऊ लागला आहे. राहिला प्रश्न ईव्हीएमच्या क्षमतेपेक्षा अधिक उमेदवार उभे करण्याचा... यातून सरकार व निवडणूक आयोग मार्ग काढेल, असं वाटतं.-हरिभाऊ बागडे, भाजप आमदार व विधानसभेचे माजी अध्यक्ष

निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार नाकारता तर येणारच नाही...या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार तर आहेच. तो नाकारता येत नाही. आता राहिला प्रश्न ईव्हीएम मशीनच्या क्षमतेपेक्षा अधिक उमेदवार उभे राहिल्यास काय करावयाचे? हा निर्णय सरकारने आणि निवडणूक आयोगानं घ्यायला पाहिजे. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीकडे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं आहे. आता काय मार्गदर्शन मिळतंय, ते पाहायाचं. ज्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक सरकारची ही कोंडी करीत आहेत, त्यातल्या मान्य करता येण्यासारख्या मागण्या सरकारने त्वरित मान्य केल्या पाहिजेत. मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावे हा मुद्दा आता निकाली निघाला आहे. तसे करता येत नाही, ही सर्वच राजकीय पक्षांची भूमिका राहिलेली आहे.- डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

याबद्दल ‘मविआ’चं धोरण लवकरच ठरेल....मराठा आंदोलकांच्या या अभिनव आंदोलनासंदर्भात महाविकास आघाडीचं धोरण ठरलेलं नाही. लवकरच ते ठरेल. त्यामुळे सध्या यावर मला काही प्रतिक्रिया द्यावयाची नाही.-चंद्रकांत खैरे, माजी खासदार व गटनेते शिवसेना (उबाठा)

... हा तर ईव्हीएमवरचाच रोषईव्हीएमच्या क्षमतेपेक्षा अधिक उमेदवार उभे करणं हा आंदोलनाचा पवित्रा असून यात ईव्हीएमवरचाच अधिक रोष दिसत आहे. जनतेचा यात प्रत्यक्ष सहभागही लाभत आहे. अशा उमेदवाऱ्या दाखल करण्यासाठी जनताच पैसा देत आहे. या अशा आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबाच आहे. कारण स्वत: बाळासाहेब आंबेडकर ईव्हीएम विरोधात फार पूर्वीपासून लढत आहेत. शिवाय मनोज जरांगे यांच्या गरीब मराठ्यांच्या लढ्यालाही आमचं समर्थन आहेच.- फारुक अहमद, राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी

ही मनोज जरांगे यांची अधिकृत भूमिका नाही.....ईव्हीएम क्षमतेपेक्षा अधिक उमेदवार उभे करून सरकारची व निवडणूक आयोगाची कोंडी करण्याची भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची नाही. त्यांना मानणारे लोकच परस्पर हा कार्यक्रम करीत आहेत व त्याला चांगलाही प्रतिसाद मिळत आहे. पत्रकार जेव्हा जरांगेंना याबद्दल विचारतात, त्यावेळी ते सरळ राजकारण हा माझा प्रांत नाही, असं सांगतात. १३ मार्चपर्यंत त्यांचे दौरेच सुरू आहेत. त्यानंतर मी त्यांच्याशी या मुद्यावर बोलणार आहे.- हभप प्रदीप सोळुंके, मनोज जरांगे समर्थक.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षण