शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

महिन्याभरात मृतसाठयातील जायकवाडी धरण ७६ टक्क्यांवर, आज माजलगावसाठी केला विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:27 IST

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे.

- दादासाहेब गलांडेपैठण ( बीड) : जायकवाडीच्या नाथसागर धरणाची परिस्थिती जुलै  महिन्यात अगदी मृत साठ्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात नाशिकसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्याप्रमाणावर आवक वाढली. यामुळे आज धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे. दरम्यान, वाढती आवक लक्षात घेऊन शून्य टक्के पाणी असलेल्या माजलगाव धरणात उजव्या कालव्यातून दुपारी १ वाजता १०० क्युसेक विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. 

पाणलोट क्षेत्रात झालेला मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि वरच्या भागातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण भरल्याने जायकवाडी धरणात आवक वाढली. यामुळे जुलै महिन्यात मृतसाठ्यात असलेलले जायकवाडी धरण ऑगस्ट महिना संपतासंपता ७५.९ टक्क्याच्या पुढे गेले आहे. आता येणाऱ्या पाण्याची आवक थोडी मंदावली असून ४६ हजार ६८२ क्युसेकने पाणी धरणात येत आहे.  दरम्यान, माजलगावच्या ३२ टीएमसीच्या धरणासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून दुपारी एक वाजता शंभर क्युसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच रात्रीतून हळूहळू पाण्याचा वेग वाढवला जाणार असल्याचे शाखा अभियंता विजय काकडे म्हणाले.

जायकवाडी नाथसागर धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. धरणाची पातळी १५२२ फूट आहे. आज रोजी पाणी पातळी १५१७.६९ फूट झाली आहे. माजलगाव धरण ३२ टीएमसीचे आहे. माजलगाव धरण 0% टक्क्यावर असल्यामुळे आज दुपारी १ वाजता जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी  सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद