शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

‘सातबारा’चे काम रखडले

By admin | Published: December 14, 2015 11:53 PM

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. सातबारा आॅनलाईन करण्याचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी खुलताबाद, कन्नड, फुलंब्री या ३ तालुक्यांचे सातबारा आॅनलाईन मिळतात. तर औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव या ६ तालुक्यांचे आॅनलाईन सातबारा करण्याचे काम रखडले आहे. त्यातच सेतू सुविधा केंद्राचा करार अद्याप झालेला नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सातबारा आॅनलाईन करण्याच्या कामासाठी समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल प्रशासनाचे कामकाज आॅनलाईन करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे काम २ वर्षांपासून रखडले आहे. सातबाराच्या नोंदी आॅनलाईन करण्यासाठी प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी सूचना दिल्या होत्या. आॅनलाईन करण्याचे काम तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात होऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी देण्यात आलेल्या आदेशातून काही साध्य होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. तलाठ्यांना सातबारा अपडेट करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रातून सुविधा दिली होती. दर १५ दिवसांनी तलाठ्यांनी थम्बच्या साह्याने लॉगिंग करून सातबारा अपडेट करण्याचे सांगण्यात आले होते; परंतु संकेतस्थळ सुरू करताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने ते काम रेंगाळले. एनआयसीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरने सातबारा आॅनलाईन केले जात असले तरी त्यांच्याकडे डाटा उपलब्ध नसल्यामुळे हे काम ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१३ मधील जुन्या रेकॉर्डनुसार सातबारा मिळत असून, नवीन नोंदीचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. नवीन नोंदी नसल्यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहार करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उतारा घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे तलाठ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना सातबारा मिळवावा लागत आहे. तलाठ्यांकडे अनेक कामे असल्याने त्यांच्याकडे चकरा माराव्या लागत असून, सातबारा उतारा मिळत नसल्याची ओरड होत आहे. खरेदीखताच्या नोंदणीसाठी आॅनलाईन सातबारा स्वीकारला जात नसून तलाठ्यांनी हाताने लिहिलेला सातबारा आणावा लागतो आहे.