शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी?

By साहेबराव हिवराळे | Published: January 05, 2024 4:55 PM

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-६ परिसरातील मथुरानगर, संभाजी कॉलनी कामगार कुटुंबियासाठीची वसाहत आहे. त्या ठिकाणी कौटुंबिक गरजेनुसार राहण्याची सुविधा झाली परंतू मुलभूत गरजा सिडकोतून मनपात आल्यानंतर फारशा प्रमाणात प्रामुख्याने सोडविल्या नाहीत. कामगारांची मुलं डॉक्टर,वकील, इंजिनिअर, बँक तसेच मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहेत.

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत. परंतु, अस्वच्छतेतून कधी उजाडणार मथुरानगर- संभाजी काॅलनीची पहाट अशी अवस्था आहे. सिडकोत असताना येथील नागरिकांना सिडको सेवासुविधा देत होती. आता मनपाकडे हस्तांतरण झाल्यावर सेवासुविधा देण्याची जबाबदारी आहे. परंतु त्या काळात टाकलेल्या ड्रेेनेज लाईनवरच वाढलेल्या कुटुंबाचा भार आहे. त्यामुळे मथुरानगरात ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रकार दिवसाआड बघायला मिळतात. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही त्याचे निराकरण होत नाही. कचरा गाड्या घरापर्यंत येऊन कचरा घेऊन जाणार असा नियम असतानाही गाड्या सरळ रस्त्याने निघून जातात अन् त्यामुळे नागरिक घरातील कचरा रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानावर टाकून निघून जातात. परंतु जेव्हा घरी ये-जा करताना अनेकदा नाक दाबून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

औषध फवारणी करणाऱ्यांचाही फेरफटका येथे दिसत नाही, त्यामुळे डासाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागतो. परिसराची भौगोलिक रचना टेकडीची असल्याने घराची उंची समान दिसत नाही. असे विविध प्रश्न नागरिकांचा पाठलाग सोडत नसल्याची खंत स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

उद्यानात दारूड्यांची भीतीमथुरानगर व संभाजी कॉलनीच्यालगत असलेल्या भव्य-दिव्य उद्यान सिडकोने हस्तांतर केले. मात्र, त्याची दुरावस्था झाली आहे.

उद्यानात सुरक्षा महत्वाचीउद्यानात बोअरवेल पेव्हर ब्लॉक, जाॅगिंगसाठीची तयारी असली तरी येथे दारूच्या रिकाम्या बाटली अन् दारूड्याचा आश्रय असल्याने येथे इतरांंना चांगल्या कामासाठी वापर करणे शक्य होत नाही.- मनिष नरवडे

कचऱ्याची विल्हेवाट लावावीसुंदर शहर स्वच्छ शहर ही घंटा गाडीवरील गीत ऐकून शहर कचरा मुक्त होणार, अशी आशा बळावली होती. परंतु गाड्या घरापर्यंत येऊन कचरा नेत नाहीत. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास किती दिवस सहन करावा.-कुणाल परदेशी

रस्त्यावर ड्रेनेजचे पाट कधी थांबणार?जुन्याच ड्रेनेज लाइन असल्याने त्यावर अधिकचा भार पडत आहे. पावसाळ्यात तर रस्ते ओलेच असले तर समजून घेता येते; परंतु हिवाळा आणि उन्हाळ्यातही ड्रेनेज चोकअप होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहते. त्यावेळी नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागते. जुन्या लाइन बदलून नवीन लाइन टाकण्याची गरज आहे.- कृष्णा नरवडे

अंतर्गत रस्ते सुधार कधी?मुख्य रस्ते गुळगुळीत केलेले आहेत. परंतु, अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. रस्त्यावरून घर गाठताना ओबडधोबड रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे वाहनाचे नुकसान होते आणि नागरिकांना पाठदुखीचा ही आजार जडत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे. अंतर्गत रस्त्याची अवस्था सुधारावी, अशी मागणी आहे.- आकाश साबळे

बिघडलेल्या बोअरवेल सुधारासिडको एन-६ परिसरात लोकप्रतिनिधी तसेच मनपाच्या वतीने बोअरवेल टाकण्यात आलेले आहेत. परंतु, त्यापैकी जुन्या मनपाच्या शाळेतील बोअरवेल फक्त सुरू असून, त्याचा जनतेला काही फायदा नाही. इतर बोअरवेल बिघडलेले असताना मनपाच्या टंचाईत ते मनपाने दुरुस्ती केलेले नाही.- किरण पाटील शिरवत 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका